Monday, 30 October 2023

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ५

 

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ५
ऋग्वेदात स्वतःस आर्य म्हणविणारे भरतवंशी पुरु लोक त्यांच्या शत्रूंना मृध्वाच् म्हणत जसे आजच्या इराणमध्ये त्याकाळी असलेले लोक स्वतःस आरिय आणि शत्रूंस तुरिय म्हणत तसेच. देववात, सृंजय, दिवोदास (सृंजयपुत्र), सुदास्, सहदेव, सोमक (सहदेवपुत्र) इत्यादि ऋग्वेदात येणारे भरत पुरु राजे स्वतःस आर्य म्हणवत आणि विरोधकांना दस्यु. ऋग्वेदात आंगिरस, वासिष्ठ, वैश्वामित्र या भरत पुरुंशी संबंधित ऋषीकुळांनी आणि स्वतः भरत लोकांनी मिळून एकूण ३१ वेळा आर्य शब्द स्वतःसाठी (भरत पुरुंसाठी) वापरला आहे. ३ वेळा काण्व लोकांनीही आर्य शब्द वापरला आहे आणि तोही एकट्या भरत राजा दिवोदासासाठी.
ऋग्वेदाच्या १० मंडलांची आधुनिक अभ्यासक लोकांनी जुनी आणि नवीन अशी विभागणी केली आहे ज्यात २, ३, ४, ६, ७ इत्यादि जुनी मंडले आहेत आणि यांमध्ये भरत पुरु हे नायक आहेत. ऋग्वेदाचा बराच भाग भरत पुरुंच्याच अनुषंगाने दिसतो. ऋग्वेदातील १०२८ ऋचांपैकी १९ ऋचा स्वतः भरत लोकांनीच रचल्या आहेत. ऋग्वेद रचणाऱ्या १० कुळांपैकी १ कुळ भरत पुरु होते.
ऋग्वेदात मंत्रास ऋचा तर त्याच्या द्रष्ट्यास ऋषि ही संज्ञा आहे. ऋषिर्दर्शनात् म्हणजेच जो वेदमंत्र पाहतो तो ऋषि. या न्यायाने काही स्त्रियाही ऋषिसंज्ञेला प्राप्त आहेत. बऱ्याच सुक्तांचे ऋषि ज्ञात नसल्याने त्यांचे कर्तृपद त्या सूक्तातील देवतेला दिले आहे किंबहुना बरेचदा स्वतः ऋषींनीच तसे केलेले आहे. बहुतेक ऋषि गृहस्थ होते, ऋषि हे काही आश्रम नव्हे. ऋग्वेदात आंगिरस, भार्गव, वासिष्ठ, कौशिक, आत्रेय, काश्यप इत्यादि ऋषींची मुख्य कुळे आपल्याला दिसतात. वेदांमध्ये ब्राह्मण तसेच क्षत्रिय ऋषींची नावेही आहेत ज्यांना राजर्षी म्हटलेले आहे.
ऋग्वेदात ऋषीकुळांप्रमाणेच नानाविध क्षत्रिय जमातींची नावेही येतात. या जमातींमध्ये तृक्षि (इक्ष्वाकु) सारख्या सूर्यवंशी तर यदु, तुर्वसु, दृह्यू, अनु, पुरु इत्यादि चंद्रवंशी म्हणविणाऱ्या जमातींचा अंतर्भाव होता. या क्षत्रिय जमातींनी तत्कालीन उत्तर भारतातील वेगवेगळे प्रदेश व्यापलेले होते. या सर्व जमातींची मूळ स्थानं अशी दिसतात
१) इक्ष्वाकू- उत्तरप्रदेश, बिहार
२) यदु- गुजरात, राजस्थान, माळवा
३) तुर्वसु- पूर्व भारत
४) दृह्यू- पंजाब
५) अनु- काश्मीर
६) पुरु- हरियाणा, पश्चिम उत्तरप्रदेश (पश्चिमेकडून पूर्वेकडे वळत गेले.)
पुराणांमध्येही या जमातींचे उल्लेख आहेत परंतु तिथे यांसाठी जमातींऐवजी वंश शब्द योजला आहे. या जमातींपैकी यदु, तुर्वसुंचा उल्लेख सोबत येतो आणि ते वैदिक नाहीत असे निदर्शनास येते, त्यांचे बरेचदा एकमेकांना समर्थन तर कधी विरोधही असे. तुर्वसु लोकांचा तीनदा तर अनु लोकांचा चारपैकी दोनदा उल्लेख हा वैदिक पुरुंच्या शत्रूगटात आहे.
अनु लोकांमध्ये पार्शव (पर्शियन), पार्थव (पार्थियन), पक्थ (पख्तुन), भलण (संभवत: बलोच) असे लोक होते. उत्तर काळात भृगु/भार्गव ऋषीकुळाचे लोक हे पार्शव नामक अनु जमातीच्या लोकांचे (इराणी लोक) पुरोहित होते ज्यांपैकी जमदग्नी भार्गव हे एक घराणे वैदिक लोकांच्या पक्षात आलेले दिसते ज्यामुळे त्यांना ऋग्वेदात महत्व प्राप्त झाले.
आता वळूया ऋग्वेदातील युद्धांकडे. पुरु आणि त्यांचे शत्रू यांच्यात झालेल्या तीन युद्धांचे वर्णन आपल्याला ऋग्वेदात मिळते
१) प्रथम युद्ध भरत राजा सृंजयच्या काळी हरियाणात हरियुपिया नदीच्या काठी झाले होते.
२) द्वितीय युद्ध भरत राजा सुदास् याच्या काळी भारत पाकिस्तान सीमेजवळ परुष्णी (सांप्रत रावी नदी) नदीच्या तटावर झालेले दाशराज्ञ युद्ध.
३) तृतीय युद्ध अफगाणिस्तानात सहदेव, सोमकाच्या काळी झाले ज्यास वार्षागीर युद्ध म्हणतात.
भौगोलिक स्थानांच्या निरीक्षणोपरांत लक्षात येते की या युद्धांचा क्रम पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. प्रत्येक युद्धानंतर अनु लोक पुरुंकडून पश्चिमेला ढकलले जात होते. आर्मेनियन, अल्बानियन, इराणीयन, ग्रीक ही इंडो-युरोपियन भाषाकुळं भारतातून सर्वात शेवटी बाहेर गेली होती जी याच अनु जमातींची असावीत.
आता उपरोल्लेखित तिन्ही युद्धांचा आढावा घेऊ
१) हरियूपीयाचे युद्ध
ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात ६.२७ या सुक्तात आपल्याला या युद्धाचा वृत्तांत दिसतो. हे युद्ध यव्यावती आणि हरियूपीया (सांप्रत हरियाणातील घग्गर नदी) या सरस्वतीच्या उपनद्यांच्या काठी झाले होते. या संग्रामात भरत पुरु राजा सृंजय याने अनु लोकांच्या अभ्यावर्तीन् चायमान नामक राजाच्या सहाय्याने पंजाबात शिरलेल्या यदु आणि तुर्वसु लोकांवर विजय मिळविला होता.
२) दाशराज्ञ युद्ध
ऋग्वेदाच्या सातव्या आणि तिसऱ्या मंडलांत भरत राजा सुदास् याचा युद्ध करताना उल्लेख आहे. राजा सुदास् याचे मंडलांमध्ये अनुक्रमे वासिष्ठ आणि वैश्वामित्र कुळांतील ऋषि राजपुरोहित होते. तिसऱ्या मंडलात ३.३३ या सुक्तात राजा सुदास् याला यज्ञासाठी आवश्यक असणाऱ्या सोम वनस्पतीच्या प्राप्तीसाठी तिचे उत्पादन होणाऱ्या वायव्य भारतास आपल्या राज्यात जोडण्याच्या हेतूने शुतुद्री (सांप्रत सतलज नदी) आणि विपाशा (सांप्रत बियास नदी) नद्यांपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार करतो. याच मंडलात ३.५३ व्या सुक्तात सुदास् साठी विश्वामित्र अश्वमेध यज्ञ करतात पण तदुपरांत विजयाचा मात्र उल्लेख येत नाही. सातव्या मंडलात वसिष्ठ १८, ३३, ८३ या ऋचांमध्ये सुदास् राजाच्या युद्धाचे आणि ५, ६ या ऋचांमध्ये युद्धानंतरचे वर्णन करतात. हे युद्ध पूर्वेस यमुनातीरावरचे असून दाशराज्ञ युद्धापूर्वीचे आहे.
या यमुना तीरावरील युद्धातील नावं संस्कृत तर परुष्णी (सांप्रत रावी नदी) तटावर झालेल्या दाशराज्ञ युद्धातील नावं इराणी, ग्रीक, आर्मेनियन, आल्बेनियन नावांसदृश आहेत. यमुना तीरावरील युद्धातील शत्रूंची नावं भेद, अज, देवक, श्रीघु, यक्षु, मन्यमान, तुर्वसु, मत्स्य, पुरु (भरतेतर पुरु) अशी संस्कृत आहेत तर दाशराज्ञ युद्धातील शत्रूंची नावं (ऋचा क्रमांक आणि नाव) खालीलप्रमाणे
१) ७.८३.१ - परशु/पार्शव, पृथु/पार्थव, दास
२) ७.१८.५ - शिम्यु
३) ७.१८.६ - भृगु, द्रुह्यू
४) ७.१८.७ - अलिन, भलण, पक्थ, शिव, विषाणीन
५) ७.१८.८ - कवी चायमान (अनु राजा)
६) ७.१८.११ - वैकरण
७) ७.१८.१२ - द्रुह्यू, कवष (अनुंचा पुरोहित)
-> हीच नावं मज्दयस्नी/झरथुष्ट्री लोकांच्या अवेस्तात (स्थलपरत्वे) पुढीलप्रमाणे आहेत (कंसात ऋग्वेदातील नावं आहेत)
१) अफगाणिस्तान - सयरीमा (शिम्यु), दही (दास), वैकरत (वैकरण)
२) ईशान्य अफगाणिस्तान - नूरीस्तानी/पिशाचिन (विषाणीन)
३) पख्तुनिस्तान - पख्तुन/पश्तु (पक्थ)
४) बलुचिस्तान - बलुची/बोलन (भलण)
५) ईशान्य इराण - पार्थियन/पार्थव (पृथु/पार्थव)
६) नैऋत्य इराण - पर्शियन/परसुआ (परशु/पार्शव)
७) उझबेकिस्तान - ख्वारेमियन/खिवा (शिव)
८) पश्चिम तुर्कमेनीस्तान - दहाए (दास)
९) युक्रेन, दक्षिण रशिया - अलन (अलिन), सर्मेशियन (शिम्यु)
१०) कौसा (कवष)
११) कौई (कवी)
-> आर्मेनियन भाषाकुळातील थ्रॅको/फ्रिगियन जमाती
१) टर्की - फ्रिगियन/फ्रिगे (भृगु)
२) रोमानिया, बल्गेरिया - डाकीयन (दास)
-> ग्रीक भाषाकुळात
१) हेलेना (अलिन)
-> अल्बानियन/इलीरियन भाषाकुळातील जमाती
१) सिर्म्युम/सिर्मियो (शिम्यु).
उपरोक्त समस्त जमाती दाशराज्ञ युद्धापूर्वी पंजाब प्रदेशात होत्या ज्या भरत पुरुंशी झालेल्या संघर्षानंतर विस्थापित झाल्या. या जमातींच्या वेगवेगळ्या भाषांमधील नावांचे साम्य आणि भाषिक संबंध बघता ही भाषाकुळं आणि जमाती मूळच्या भारतीय असून पराजय झाल्यावर पश्चिमेला गेल्या असणे संभवनीय आहे.
३) वार्षागीर युद्ध
या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धाचा वृत्तांत पहिल्या आणि चौथा मंडलात अंतर्भूत आहे. १.१००, ४.१५ या सुक्तांत आणि ४.३०.१८ या ऋचेत सहदेव आणि सोमक या भरत राजांचा उल्लेख आहे. वार्षागीरवंशीय पुरु पितापुत्रांनी गाजवलेल्या या समराचे वर्णन अवेस्तातही आहे. या युद्धातील शिम्यु लोकांचे ७.१८.५, १.१००.१८ या ऋचांमधील उल्लेख वार्षागीर युद्धास दाशराज्ञ युद्धाशी जोडतात. याव्यतिरिक्त शिम्यु लोकांचे इथे उल्लेख नाहीत. या युद्धात शत्रूंची नावं स्पष्ट केलेली नाहीत.
युद्धभूमीवर अरण आणि चित्ररथ हे आर्य सरयु नदीच्या (सांप्रत अफगाणिस्तानातील हरि नदी) पलीकडे मारल्याचे उल्लेख ४.३०.१८ क्रमांकाच्या ऋचेत आहेत. हे उभय आर्य भरत पुरु होते जे शत्रू पक्षात सहभागी झाले होते. या युद्धातील जेत्यांची नावं १.१००.१७ या ऋचेत ऋज्राश्व, भयमान, सुराधस्, अंबरिष, सहदेव अशी दिली आहेत. अवेस्तात या युद्धासंदर्भात म्हटले आहे की मनुश्चित्र (आजचे पारशी लोकांचे मिहोचेर नाव याचाच अपभ्रंश आहे) नामक इंडो-आर्यन त्यांच्या (पराभूत शत्रूंच्या) बाजूने लढला. पहलवी ग्रंथात यष्त १९.१ मध्ये म्हणतात की त्याचा जन्म मनुशाजवळ (हरियाणातील एक तलाव) झाला. फरवर्दीन यष्त १३१ अनुसार मनुश्चित्र हा अरियुचा पुत्र होता. ही मनुश्चित्र आणि अरियु नावं अनुक्रमे चित्ररथ आणि अरण असणार. अवेस्तात ऋज्राश्व हा तुराणी नेता असून त्याचे नाव अर्जतस्प किंवा अर्जस्पा म्हटले आहे. शाहनामेत (४६२ वा अध्याय) सहदेव हा ऋज्राश्वाचा सहकारी असून त्याचे नाव हुष्दीव म्हटले आहे. सुराधस् हे बहुधा सुदास् राजाच्या वंशजांसाठी वापरले असावे कारण राधस् म्हणजे संपत्ती आणि सुराधस् म्हणजे दान केलेली उत्तम संपत्ती ज्याचा अर्थ सुदास् असाच आहे. या संग्रामावेळी सुदास् जिवंत नव्हता तेव्हा हा त्याचा वंशज सोमक असावा ज्याचा अवेस्तात (शयरियारजींच्या मते) हुमायक असा नामोल्लेख आहे. भयमान आणि अंबरिष ही नावं अवेस्तात प्रत्यक्षपणे नाहीत. अंबरिष इक्ष्वाकू होता पण शयरियारजी म्हणतात की अवेस्तात ऋजाश्वासोबत विदर्फश्निक आणि वंदरमैनी अशी नावं त्याचे भाऊ आणि पिता म्हणून आहेत ज्यापैकी विदर्फश्निक आणि अंबरिषचा अर्थ उत्तम वस्त्र परिधान केलेला तर वंदरमैनी आणि भयमानचा अर्थ निर्भय असून या नावांमधील अर्थसाधर्म्य या व्यक्ती एक आहेत हे दर्शवते.
पार्थवांचे पश्चिमेस गमन
जुन्या मंडलांतील सहाव्या मंडलात पार्थव अनु राजा अभ्यावर्तीन् चायमान हा हरियाणात होता. पुढे नंतरच्या सातव्या मंडलात त्याचाच वंशज कवी चायमान हा दाशराज्ञ युद्धात सहभागी असून तो त्यावेळी पंजाबमध्ये होता. झरथुष्ट्र काळी अफगाणिस्तान वगैरे भागात कवी चायमानाच्या वंशातील म्हणजेच कवीयान राजा विष्तास्प शासन करत होता. जरी अवेस्ता हे विधान करत नसले तरीही याला नंतर पार्थियन साहित्य अवेस्तातील कवीयान राजवंश पार्थव होता असे सांगत दुजोरा देते. या तिन्ही राजांचा कार्यकाळ कालक्रमानुसार लावत भौगोलिक स्थिती बघितली असता असे निदर्शनास येत की पार्थव अनु लोकांचा प्रवास हरियाणा -> पंजाब -> अफगाणिस्तान असा पश्चिमगामी आहे.
ही तिन्ही युद्ध आणि त्यांच्या परिणामांवरून तसेच काही इतर बाबींच्या अभ्यासांती काही निष्कर्ष काढता येतील ते खालीलप्रमाणे
१] युद्धांचे महत्व
ऋग्वेद आणि पुराणं अगणित युद्धांनी भरलेली आहेत जे बहुतांश स्थानिक पातळीवर होते. कालौघात यांचे सामरिक महत्व नष्ट होऊन त्यांना आध्यात्मिक महत्व मात्र तेवढे उरले. दाशराज्ञ आणि वार्षागीर युद्ध हे सिद्ध करते की अनु इत्यादि लोक भारतातून पश्चिमेला गेले आहेत.
२] स्थलांतरांचा काळ आणि क्रम
सर्व इंडो-युरोपियन संस्कृतींमध्ये चाकांसाठी शब्द असल्याने निश्चितच ते चाकाच्या शोधापर्यंत एकत्र असणार (ख्रिस्तपूर्व ३०००-४०००). तसेच सरस्वती नदी ख्रिस्तपूर्व १९०० च्या सुमारास लोप पावली त्यामुळे ऋग्वेद तितका मागे जातो. शिवाय सर्व इंडो-युरोपियन संस्कृती भारतीय असल्या तरीही वैदिक किंवा इंडो-आर्यन नव्हत्या. फक्त मिटानी, जिप्सी हे इंडो-आर्यन होते जे पूर्वीच पश्चिमेला स्थलांतरित होऊन गेले.
हिटाईट आणि टोखारीयन ही भारतातून बहिर्गमन करणारी पहिली २ भाषाकुळं होती जी मध्य आशियात गेली. टोखारीयन मध्य आशियात राहिले पण हिटाईट मात्र ईशान्येकडून टर्कीत गेले जे त्यांच्या मंगोल लोकांशी असलेल्या संबंधांवरून कळते. नंतर स्लाव्हिक, जर्मेनिक, इटालियन, केल्टिक, बाल्टिक लोक भारतातून पश्चिमेला गेले. आणि अखेरीस इराणीयन, ग्रीक, अल्बानियन, आर्मेनियन हे बाहेर पडले ज्यांची नावं दाशराज्ञ युद्धात आहेत. भारतात सरतेशेवटी फक्त इंडो-आर्यन भाषक उरले.
३] पहिले आणि तिसरे स्थलांतरण
भारतातून बाहेर एकूण जायचे ३ प्रवाह होते.
१) पहिले म्हणजे हिटाईट आणि टोखारीयन जे मध्य आशियात गेले ज्यांना पुढे पुराणांमध्ये उत्तर मद्र आणि उत्तर कुरु म्हटले असावे.
२) तिसरे आणि सर्वात मोठे स्थलांतरण म्हणजे भरत पुरुंकडून पराभूत अनु लोकांचे म्हणजेच इराणीयन, ग्रीक, अल्बानियन, आर्मेनियन लोकांचे.
४] दुसरे स्थलांतरण
दुसरे स्थलांतरण होते द्रुह्यू म्हणजेच स्लाव्हिक, जर्मेनिक, इटालियन, केल्टिक, बाल्टिक लोकांचे जे ऋग्वेदपूर्व काळी झाले. यांचे उल्लेख वायुपुराण (९९.११.१२), ब्रह्मांडपुराण (३.७४.११.१२), मत्स्यपुराण (४८.९), विष्णुपुराण (४.१७.५), भागवतपुराण (९.२३ १५.१६) इत्यादित येते. हे लोक आधी उत्तरेस आणि मग तिथून वायव्येस युरोपात गेले. उर्वरित द्रुह्यू दाशराज्ञ युद्धात दिसतात ज्यांना ऋग्वेद आणि अवेस्तात शत्रू म्हटले आहे. पुरु, द्रुह्यू, अनु यांचे पुरोहित अनुक्रमे आंगिरस, दृईड, भृगु/अथर्वण (आजही मज्दयस्नी/झरथुष्ट्री पुरोहितास अथर्वण म्हणतात) होते. झरथुष्ट्र हा भृगु/अथर्वण होता जो अरण्यात तप करत असताना त्याला अंगरा आणि द्रुज त्रास देतात. हा झरथुष्ट्र असुरमेधाचा (अहुरामज्दा) भक्त होता जो तक्षशिलेत शिकला आणि वयाच्या तिसाव्या वर्षी याला असुरमेधाचा साक्षात्कार झाल्यावर हा इराणमध्ये गेला होता. तेथे गेल्यावर तो पार्थव अनु राजा विस्ताष्पाचा पुरोहित झाला आणि पुढे त्यानेच मज्दयस्नी/झरथुष्ट्री धर्माची स्थापना केली.
५] जमाती आणि धार्मिक मान्यता
१) यज्ञ परंपरा पुरु, अनु, द्रुह्यू लोकांमध्ये समान होती पण उर्वरित भारतात त्यावेळी वैदिकेतर लोकही होते. आयर्लंडमध्ये मंदिरात अजूनही मज्दयस्नी/झरथुष्ट्री लोकांसारखे यज्ञ वगैरे ठेवतात ज्यास मज्दयस्नी/झरथुष्ट्री जस्न म्हणतात. हा शब्द संस्कृतमधील यत्न चा अपभ्रंश आहे. श्रौत परंपरा वेद, मज्दयस्नी/झरथुष्ट्रींमध्ये आहे.
२) यदु लोक निसर्गपूजक असावे. जसे पुराणांत यदु हे गोसेवक असत तसेच वासुदेव कृष्ण गोवर्धनपूजेचे महत्व पटवून देतात त्यावरून असे अनुमान बांधणे तर्कविसंगत ठरणार नाही.
३) उत्तर वैदिक काळातील बहुतांश उपनिषदं जनकादिक इक्ष्वाकू राजांच्या दरबारात स्फुरलेली आहेत. हे लोक तत्वज्ञानी, दार्शनिक होते. भविष्यात याच पूर्वेकडील भागात जैन, बौद्ध, आजीवक, चार्वाक अशी दर्शनं उदयास आली. म्हणजे पूर्व भारतात तत्वज्ञानाचा इतिहास जुना असावा.
४) दक्षिणेकडील शिल्पशास्त्र, मंदिरं तथा मूर्तीशास्त्राचा अद्वितीय उत्कर्ष लक्षात घेतला असता या प्रदेशात आजच्या हिंदूंचा गाभा असलेली मूर्तिपूजा कदाचित् या काळापसूनच रूढ असावी.
५) अति पूर्वेकडील आणि ईशान्य भारतात तंत्र, मंत्र इत्यादि विद्या पूर्वापार दिसतात ज्यांचे प्रस्थ या काळापासून असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व वैदिक, अवैदिक असलेल्या भारतीय संस्कृती जश्या एकमेकांच्या संपर्कात येत गेल्या तशी त्यांच्यात सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक देवाणघेवाण होऊन सरमिसळ झाली असावी ज्याचे फलश्रुति आजचा भारतीय हिंदू समाज आहे.
६] जमातींचे एकसूत्रीकरण
वेदांमध्ये यदु, तुर्वसु, द्रुह्यू, अनु, पुरु या वेगवेगळ्या जमाती असून त्यांच्यातील परस्पर सत्तासंघर्ष सिद्ध होत असला तरीही पुराणांत हे सर्व एकाच चंद्रवंशीय राजा ययाति याच्या संतती असल्याचे प्रतिपादन केलेले आढळते. यावर काही अभ्यासकांचे असे मत आहे की कदाचित् वेदांच्या रचनेच्या उत्तरकाळात या सर्व जमातींमधील आपापसातील वैमनस्य संपवून त्यांना एकसंध करायला त्यांची उत्पत्ती ही एकाच पूर्वपुरुषापासून झाली असावी असे कथात्मक दृष्टीने सांगितले असावे.
७] आर्य आणि एतद्देशीय स्थाननिश्चिती
भरत पुरुंच्या तिन्ही युद्धांवरून वेगवेगळ्या जमातींचे भारताबाहेर गमन सिद्ध होते.
सम्राट अशोकाचे ख्रिस्त तिसऱ्या शतकातील स्तंभलेख हे सांप्रत भारतभूवर उपलब्ध सर्वात जुने लेख आहेत. पश्चिम आशियात इराक, सीरियामध्ये भारतातून गेलेल्या मिटानी (ख्रिस्तपूर्व १४६०-१३३०) राजांनी राज्य केले. हे राज्य हुराईक भाषक लोकांचे होते जे इंडो-आर्यन भाषक नव्हते पण त्यांच्या राजांची नावं वैदिक होती. याच लोकांनी रथांचा उपयोग पाश्चात्य जगास परिचित करून दिला. यांच्या एका शिलालेखामध्ये वरुण, इंद्र, मरुत्, अश्विनीकुमार, इत्यादि वैदिक देवतांची नावं आहेत. तेव्हा भारतात ख्रिस्तपूर्व ३०० च्या आधीचे वैदिक उल्लेख नसले तरीही पश्चिम आशियात ख्रिस्तपूर्व १५०० चे मिटानी राजांचे उल्लेख आहेत. त्यांचे पूर्वज इंडो-आर्यन भाषक होते आणि पश्चिमेला गेल्यावर ते स्थानिक लोकांमध्ये मिसळले जे इंडो-युरोपियन नव्हते. भाषा बदलली तरीही मिटानी लोकांनी स्वतःची वैदिक नाव मात्र जपली होती. मिटानी लोकांमध्ये आकडे, नावं, अश्वविद्येशी निगडित गोष्टी, काही देवता वैदिक संस्कृतशी संबंधित दिसतात.
शिवाय मिटानी लोकांच्या पूर्वीचेही ख्रिस्तपूर्व १७०० मध्ये इराकच्या कॅसाईट नामक लोकांचे वैदिक नावांचे उल्लेख आहेत जे इंडो-आर्यन भाषक नव्हते हे सर्वमान्य आहे. सूर्य, मरुत्, भग अशी वैदिक नावं यांच्याकडे दिसतात तसेच अभिरथस नामक एका राजाचेही नाव दिसते जे वैदिक आहे.
कॅसाईट आणि मिटानी ही मंडली इंडो-आर्यन लोकांमधून विभक्त होऊन भारतातून स्थलांतरित झाली तेव्हा निश्चित ऋग्वेदाचा उत्तर काळ सुरू होता. ते पश्चिम आशियात स्थायिक होऊन त्यांना आपल्या इंडो-आर्यन भाषांचा विसर पडायला साधारणत: २००-३०० वर्षांचा कालावधी लागला असणार. या लोकांचे अस्तित्व अनुक्रमे ख्रिस्तपूर्व १७०० आणि १५०० मध्ये होते हे सिद्ध झाले आहे. म्हणजे ऋग्वेदोत्तर काळ ढोबळमानाने ख्रिस्तपूर्व २००० वर्षे मागे जातो. तसेच नवीन आणि जुन्या मंडलातील काळाचे अंतर लक्षात घेऊन आणि हा सांस्कृतिक बदल व्हायला लागलेला कालावधी धरून ऋग्वेदाच्या आरंभीच्या मंडलांचा काळ किमान ख्रिस्तपूर्व २५००-३००० तरी असणार.
तसेच वेदांचा काळ ठरवायचे मुख्य दोन घटक म्हणजे ख्रिस्तपूर्व १२०० च्या जवळपास भारतात लोहयुग सुरू झाले ज्याच्यापुर्वी ऋग्वेदाची निर्मिती पूर्ण झाली. ऋग्वेदात चाकांचे उल्लेख आहेत ज्यांचा शोध ख्रिस्तपूर्व ४००० च्या सुमारास लागला. म्हणजे ऋग्वेदाच्या रचनेचा काळ या दोन्हीच्या मधला, ख्रिस्तपूर्व १२००-४००० असा असावा.
हा जुना वैदिक किंवा इंडो-इराणीयन काळ अस्तित्वात असताना त्याच भागात विकसित अशी सिंधू संस्कृती नांदत होती पण वेदांमध्ये तिचा वेगळा स्वतंत्र उल्लेख नाही. यावरून असे म्हणणे असंयुक्तिक नाही की वैदिक संस्कृती हीच सिंधू-सरस्वती संस्कृती असणार.
____
श्री श्रीकांत तलगेरी यांची उपरोक्त सर्व विधानं आणि तर्क आर्यांच्या बाहेरून भारतात येण्याचा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध करतात तसेच ऋग्वेदात नमूद असलेल्या प्राचीन भारतीय जमाती आणि त्यांच्या धार्मिक मान्यतांचा, संस्कृतींचा आजच्या सांस्कृतिक परिस्थितीवरील परिणाम कसा झाला यासंबंधी महत्वपूर्ण माहिती देतात.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ४

 

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ४
पुरातत्वशास्त्रीय आधार
भूमिगर्भात काय दडले आहे हे शोधून त्याचा अभ्यास करणे तथा त्यानुसार भूतलावर पूर्वी काय घडून गेले हे आपल्याला पुरातत्वशास्त्र सांगू शकते. ही विद्या जगन्मान्य असून पुराव्याशिवाय काहीही स्वीकारणे हे पुरातत्वशास्त्रात नियमबाह्य मानले जाते आणि त्यामुळेच हे शास्त्र जे काही तर्क वर्तवते त्याचे खंडन करणे क्लिष्ट असते. भारतात आंग्लाईत अलेक्झांडर कनिंगहमने या शास्त्राचा पाया रोवला होता.
AIT/AMT च्या मते ख्रिस्तपूर्व ३००० पर्यंत सगळे इंडो-इराणीयन मूळस्थानात एकत्रित होते आणि नंतर विस्थापित झाले. बुद्धकाळापासून तरी भारतात इंडो-आर्यन भाषा असल्याचे उल्लेख आहेतच, तेव्हा या भाषा पूर्व भारतापर्यंत पसरल्या म्हणजे निश्चितच वैदिक काळ बुद्धाच्या पूर्वीचा आहे हे सत्य मानावे. हा वैदिक काळ बराच मोठा असून ऋग्वेद हा त्यांचा सर्वात प्राचीन आणि अथर्ववेद सर्वात अर्वाचीन ग्रंथ आहे. वेगवेगळ्या वैदिक वाङ्मयांच्या रचनेत जरी अंदाजे २०० वर्ष अंतर धरले तरीही ख्रिस्तपूर्व १२०० च्या आधीच्या काळात ऋग्वेद लिहून पूर्णत्वास गेल्याचा मॅक्समूलर अंदाज लावतो. म्हणजे १५०० ख्रिस्तपूर्वमध्ये ऋग्वेद निर्मितिस प्रारंभ झाला असेल कारण ऋग्वेद हा अनेक पिढ्यांनी मिळून रचलेला (पारंपरिक मतानुसार दिसला) आहे. १२०० ख्रिस्तपूर्वमध्ये भारतात लोहयुग चालू होते असे सर्वमान्य आहे पण वेद त्याहीपूर्वीचे आहेत. कोणतेही युग एका वर्षात संपत नाही, तेव्हा निश्चितच ऋग्वेद त्याच्या कैक वर्षं मागे जाणार.
AIT/AMT अनुसार आर्य भारतात ख्रिस्तपूर्व १५०० च्या काळात आले आणि लगेच त्यांनी ऋग्वेद रचायला सुरुवात केली. त्यांनी ३००० वर्षांपूर्वी आपले मूळस्थान दक्षिण रशिया सोडले आणि या दोन घटनांच्या मधील १५०० वर्षात या इंडो-इराणीयन लोकांनी दक्षिण रशिया सोडला, मध्य आशियात आले, विविध ठिकाणी स्थायिक झाले, मध्य आशियात येऊन इंडो-इराणीयन संस्कृतीचा पाया घातला आणि नंतर दुभागून प्रथम समूह भारतात आणि दुसरा इराणमध्ये गेला. केवळ १५०० वर्षंच्या कालावधीत एवढा सांस्कृतिक बदल होणे पुरातत्वशास्त्रानुसार संभवनीय नाही.
पुरातत्व संशोधनावरून भारतात प्रोटो-इंडो-युरोपियन, इंडो-आर्यनचे पुरावे नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. भारतात प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष आहेत ज्याचा संबंध AIT/AMT कोणत्याही आधाराशिवाय द्राविडी लोकांशी जोडते. वास्तविक सिंधू संस्कृतीत यज्ञकुंड सापडले आहेत ज्यांस आज AIT/AMT स्वयंपाकाची भांडी मानते.
पुरातत्वशास्त्र एखाद्या ठिकाणी कोणती भाषा अस्तित्वात होती हे सांगू शकत नाही पण ढोबळमानाने अनुमान लावते जसे दक्षिण भारतात पुरावे सापडले तर ते पुरावे द्राविडी भाषकांचे असतील म्हणून. पण स्थलांतरण, वांशिक, सांस्कृतिक परिवर्तन, नवीन लोकांचे झालेले आगमन इत्यादि गोष्टी पुरातत्वशास्त्र सांगू शकते.
पुरातत्वशास्त्राच्या मते साधारणपणे २००० ख्रिस्तपूर्व काळामध्ये सरस्वतीचा लोप होण्यास आरंभ झाला. हिमालयातील परिवर्तनामुळे सरस्वतीला स्रोत म्हणून मिळणारा जलौघ बंद पडला आणि त्यामुळे हळूहळू सरस्वती मधील गाळ आणि थर वाळवंटातील वाळू यांच्या प्रभावामुळे सरस्वती हळूहळू लोप झाला. सरस्वतीच्या उपनद्या असलेल्या यमुना आणि सतलज या नद्यांनी देखील या काळात आपले पात्र वळविले ज्यामुळे सरस्वतीला उपनद्यांकडून मिळणारे पाणी बंद झाले. अर्थात् वैदिक संस्कृती ही सरस्वतीच्या काठी बहरली आणि त्यामुळेच तिचा रचना काळ निश्चितच ख्रिस्तपूर्व २००० च्या मागे जातो.
पाश्चिमात्य लोकांच्या मते ख्रिस्तपूर्व १५०० मध्ये सिंधू संस्कृतीचा लोप झाला, आणि ख्रिस्तपूर्व ११०० नंतरचा इतिहास आज उपलब्ध आहे. या दोन्ही काळांच्या मधील ४०० वर्षाच्या काळामध्ये त्यांना ऐतिहासिक पोकळी भरून काढायला कुठलेही साधन न मिळाल्यामुळे त्यांनी या ४०० वर्षात तथाकथित आर्य लोक बाहेरून भारतात आले आणि त्यांनी नष्टप्राय झालेल्या नागरी संस्कृतीस पुनरुज्जीवित केले असे प्रतिपादन केले. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे सांगितले की सिंधू संस्कृतीचा नाश याच आर्य लोकांनी केलेला आहे. या मताला छेद देताना पुरातत्वशास्त्र असे सांगते की सिंधू संस्कृतीचा नाश हा नैसर्गिक कारणांनी झालेला असून तिथे कुठलेही शस्त्र किंवा युद्धाच्या खुणा सापडल्या नसल्यामुळे कोणत्याही आक्रमकांनी त्याचा विनाश केलेला नाही. कुठल्याही संस्कृतीचा नाश कशामुळे झाला हे पुरातत्वशास्त्र काही निकषांच्या आधारावर सहज सांगू शकते.
या मतावरून कुठलेही युद्ध न झाल्याचे मत प्रस्थापित झाल्यानंतर आर्य आक्रमण सिद्धांतवादी लोकांनी जुने मत (AIT) रहित करून त्या जागी आर्य विस्थापन सिद्धांत (AMT) पुढे आणला. या मताच्या म्हणण्यानुसार जर मध्य आशियातील लोकांनी वैदिक संस्कृती भारताला दिली होती तर आज मध्य आशियात एकही वैदिक संस्कृतीची खूण का शिल्लक राहिलेली नाही? या विरुद्ध भारतीय तथाकथित द्रविड लोकांनी मात्र स्वतःची मूळ संस्कृती सोडून परकीय वैदिक संस्कृती कशी स्वीकारली? या पुरातत्वशास्त्राच्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र AIT/AMT मताची दातखिळी बसते.
पुरातत्त्वशास्त्र सांगते की सिंधू संस्कृतीच्या उत्खननात घोड्यांचे अवशेष सापडत नाहीत तसेच भारतीय उपखंडातील घोड्यांची मूळ प्रजाती फार पूर्वी लुप्त झाली असून ख्रिस्तपूर्व १५०० ते २००० या काळापासून पुनरपि घोड्यांचा संचार भारतीय उपखंडात आढळतो. पण हे आधुनिक घोडे मात्र भारतीय नसून मध्य आणि पश्चिम आशियातून आयात केलेले जाणवतात. याचे भांडवल करून AIT/AMT युक्तिवाद करते की याच काळात मध्य आशियातून तथाकथित आर्य भारतात आले जे अश्वविद्येत निपुण होते. वैदिक जन आणि घोड्यांचा संबंध अतुट आहे यात दुमत नसले तरीही वैदिक लोकसुद्धा पश्चिमेकडून या अश्वांची आयात करू शकत होते याबाबत AIT/AMT विचार करत नाही. प्राचीनकाळी अगदी सिंधू संस्कृतीच्या काळातही पश्चिम आशियाशी तत्कालीन भारताचे व्यापारी संबंध असल्याचे आज पुरातत्त्वशास्त्र मान्य करते. तस्मात वैदिक लोक जे अश्वविद्येत पारंगत होते ते भारताच्या बाहेरून घोड्यांची आयात करून त्यांचा यथायोग्य सदुपयोग करत असल्यास आश्चर्य नाही. अश्वविद्या येण्यासाठी म्हणून वैदिक लोकांना मध्य आशियात जाण्याचे प्रयोजन नव्हते.
पाश्चिमात्य पुरातत्वज्ञ के. ए. आर. केनेडी म्हणतात की "ख्रिस्तपूर्व ५००० ते ख्रिस्तपूर्व १००० या काळात असे बदल झालेले उत्तर भारत ते अफगाणिस्तान या विस्तीर्ण प्रदेशात दिसत नाहीत. त्यामुळे याकाळात आर्यच काय तर कोणतेही विदेशी लोक स्थायिक व्हायला आले नाहीत. आले असतील तर यापूर्वी किंवा नंतर. पण आर्य ३००० ख्रिस्तपूर्वच्या सुमारास मूळस्थानात होते आणि किमान १२०० ख्रिस्तपूर्व वेद रचून झाले होते जे आर्यांचे ग्रंथ होते. यावरून आर्य आगमन हे एक मिथक आहे हे सिद्ध होते."
जे. जी. शेफर म्हणतात की "सांस्कृतिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या इंडो-आर्यन लोकांचे दक्षिण आशियात पसरण्याचे किंवा स्थलांतरण करण्याचे पुरातत्त्व अभिलेखाने वर्णन केलेले नाही."
AIT/AMT चे प्रचारक आणि खंदे पुरस्कर्ते मायकल विट्झेलही मान्य करतात की "अजूनपर्यंत यावर स्पष्ट (विश्वसनीय) पुरातत्वीय पुरावे सापडलेले नाहीत."
म्हणजेच पुरातत्वशास्त्रपण आर्य बाहेरून येण्याचे पुरावे देण्याऐवजी पुराव्यांच्या आधारे आर्य भारतीय असण्यावरच भर देते.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ३

 

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक ३
वाङ्मयीन आधार
ऋग्वेद हा आर्यांचा (इंडो-इराणीयन लोकांचा) ज्ञात आद्य ग्रंथ असल्याने त्यास या सर्वांचा ऊहापोह करताना महत्वाचे मानणे अनिवार्य आहे. म्हणून AIT/AMT समर्थक आर्य आगमनाचे ऋग्वेदानुसार ३ तर्क लावतात.
१) ऋग्वेदात उल्लेख असलेल्या भारताबाहेरील जमातींची, स्थळांची त्यांना स्मृती होती. पश्चिमेकडील काही नद्यांची नावे जसे सरयु इत्यादि त्यांनी याच स्मृतींमुळे पूर्वेकडील नद्यांना दिली आहेत :
वास्तविक सर्व ऋग्वेदिय घटना या गंगा ते दक्षिण अफगाणिस्तान याच भागात घडल्या आहेत. तेव्हा AIT/AMT समर्थक लोकांचा अफगाणिस्तानापलीकडील उल्लेख असण्याचा तर्क खोटा ठरतो. AIT/AMT चे प्रचारक मायकेल विट्झेल म्हणतात की ऋग्वेदात रिप् शब्द आहे जो रशियातील रिपेयन पर्वताचा उल्लेख आहे पण या नावाचा एकही पर्वत नाही आणि असा शब्द ऋग्वेदातही नाही.
सरयु, सरस्वती या नावाच्या नद्या हरयु, हरहवती नावाने इराणीयन अवेस्तात येतात. तेव्हा हरयु, हरहवती याच खऱ्या नद्या असून त्यांची नावे पूर्वेकडील नद्यांना दिली असे त्यांचे म्हणणे आहे. पण या ग्रंथांमध्ये केवळ ही दोनच नावे समान आहेत. ऋग्वेदात येणारी सरयु ही अफगाणिस्तानातील आहे जिला आज हरि म्हणतात आणि अफगाणिस्तानी हरहवती या वैदिक भागाच्या बाहेरील आहे. तेव्हा हे पश्चिमेकडील नदीचे नाव देण्याचा संबंध येत नाही आणि भाषाशास्त्र हे अमान्य करू शकत नाही की सरस्वती वरून हरहवती नाव उदयास आले आहे. ज्या अर्थी भारतीय नावे अद्याप शुद्ध आहेत आणि ही सरयु, सरस्वती अनुक्रमे हरयु, हरहवती झाली त्या अर्थी या नद्यांचे मूळ भारतातच असणार आणि नावं मात्र पूर्वेकडून पश्चिमेला गेली आहेत. ऋग्वेदाचे जुने आणि नवीन असे दोन भाग आहेत ज्यात सरस्वती जुन्या आणि अवेस्ता नवीन काळातील आहेत. अवेस्तातील वेदिंदा या इराणीयन धर्मग्रंथात एकमात्र ठिकाणी हरहवती नाव येते.
२) सिंधू संस्कृती आधीची उपस्थित होती आणि आर्य लोक त्यांना हरवून भारतात आले :
जर आर्य बाहेरून येऊन त्यांनी त्याकाळी अतिशय प्रगत सिंधू संस्कृतीच्या अवैदिक लोकांना हाकलले असते तर त्यांचा उल्लेख ऋग्वेदात असता कारण AIT/AMT म्हणते की आर्यांनी ऋग्वेद भारतात आल्या आल्या (१५०० ख्रिस्तपूर्व) रचला. AIT/AMT म्हणते तसे सिंधू लोक द्राविडी किंवा आ᳴स्ट्रो-एशियाटिक होते, ज्याचे पुरावे नाहीत. वेदात त्यांचे उल्लेख नाहीत म्हणजे आर्यांशी त्यांचा संबंध नव्हता.
AIT/AMT समर्थक म्हणतात की दास, दस्यु, असुर आणि पणि हे सर्व द्राविडी होते पण हीच सर्व नावे युरोपीय संस्कृतीतही दिसतात जिथे द्राविडी लोक कधीच नव्हते. मग AIT/AMT च्या अशा विधानांस अर्थ उरत नाही.
३) सर्व भौगोलिक घटनांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे मार्गक्रमण दर्शवतो. आर्य पश्चिमेकडून भारतात आले आणि अथर्ववेदाच्या रचनेपर्यंत बंगालपर्यंत पोहोचले होते :
ऋग्वेद ज्याभागात रचला गेला तेथील स्थानिक भौगोलिक खाणाखुणांचे रचेत्यांनी (द्रष्ट्यांनी) निरीक्षण करून वर्णनं करून ठेवली आहेत. ऋग्वेदात उल्लेखित या भौगोलिक प्रदेशाचे ३ भागात विभाजन करता येते जसे
१. सरस्वती आणि पूर्वेकडील भाग (याचे संपूर्ण वेदात उल्लेख आहेत) : सरस्वती, दृषद्वती/यव्यवती/हरियुपिया, आपया, अश्मन्वती/अंशुमती/यमुना, गंगा/जाह्नवी इत्यादि नद्या
२. सिंधू आणि पश्चिमेकडील उपनद्या : रसा, कुभा, तृष्टमा, सुवस्तू, अनिताभा, श्वेत्या, कृमु, गोमती, सरयु, मेहत्नु, श्वेत्यावरी, गौरी, सिंधू, सुशोमा, अर्जिक्या इत्यादि नद्या
३. सरस्वती आणि सिंधूच्या मधला भाग : शुतुद्री, विपाशा, असिक्नी, परुष्णी, वितस्ता, मरूद्वृधा इत्यादि नद्या
भाषाशास्त्रज्ञांच्या मते भौगोलिक भागासारखाच कालक्रमानुसार ऋग्वेदातील १० मंडलांच्या रचनेचा एक क्रम आहे जो ६, ३, ७, ४, २, ५, १, ८, ९, १० असा आहे. यात सर्वात जुन्या ६, ३, ७ या मंडलांत केवळ पूर्वेकडील नद्यांचे उल्लेख आहेत आणि तेही वारंवार. दुसऱ्या मंडलात पूर्वेकडील नद्यांचा एकदा आणि १, ८, ९, १० मंडलांत पश्चिमेकडील सर्व नद्यांचे उल्लेख आहेत, दुसऱ्या मंडलात सरस्वतीवर ३ सुक्त असून ते तिचेच नाव घेतात. तिसऱ्या मंडलात भरतवंशी पुरु राजा सुदास् अश्वमेध यज्ञ करून पूर्व, पश्चिम, उत्तरेकडे राज्यविस्तार करतो आणि तेव्हा पुरु लोक पूर्वेकडील २ नद्या ओलांडतात हीच ऋग्वेदात उल्लेख असलेली ऐतिहासिक घटना. यात परुष्णी (रावी नदी) तटावर दाशराज्ञ युद्ध होते आणि तेही असिक्नीच्या (चिनाब नदी) खोऱ्यातील लोकांशी. सुदास् राजाच्या ३ पूर्वजांची माहितीही यात येते ज्यावरून ते आजच्या हरियाणात होते असे निदर्शनास येते. यावरूनच कळते की सुदास् जो स्वतः आर्य होता तो पूर्वेला तर त्याचे शत्रू पश्चिमेला होते.
तेव्हा अश्याप्रकारे AIT/AMT ची ही तिन्ही विधानं अमान्य करता येतात.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक २

 

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक २
भाषाशास्त्रीय आधार
सर्वप्रथम बघू आर्य शब्दाचा नेमका अर्थ आणि उत्पत्ती काय.
संस्कृतमध्ये अरि म्हणजे जो आपल्या पुढे असतो (एकतर राजा किंवा शत्रू पण इथे अपेक्षित राजा). तेव्हा त्या अरिचे/राजाचे परिजन अर्थात् सन्मानित लोकजन म्हणून अरि या शब्दाचा साधित शब्द आर्य. आर्यचा मूळ अर्थ आपले चांगले लोक असा होतो. पण जसजशी आपल्या लोकांची परिभाषा बदलत गेली तसतसे आणखीन लोकांचा समावेश होऊ लागला. हळूहळू त्याची व्याख्या अधिकाधिक व्यापक होत गेली आणि आर्यांनी व्यापलेला जो प्रदेश तो आर्यावर्त सुद्धा तसा वाढत गेला.
ऋग्वेदात स्वतःस आर्य म्हणविणारे भरतवंशी पुरु लोक त्यांच्या शत्रूंना मृध्वाच् म्हणत. आजच्या इराणमध्ये त्याकाळी असलेले लोक स्वतःस आरिय आणि शत्रूंस तुरिय म्हणत. रामायणात युद्धकांडाच्या १६ व्या सर्गात रावण रागवल्यावर विभीषणाला अनार्य म्हणतो, म्हणजे असभ्य. थोडक्यात, असंस्कृत व्यक्तीस अनार्य म्हटले जाते. उदाहरणार्थ, यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयबिन्दवः l न श्लेषमभिगच्छन्ति तथानार्येषु सौहृदम् ll, वाल्मिकी रामायण, ६-१६-११ (म्हणजे कमळाच्या पानांवर पडणाऱ्या पाण्याचे थेंब त्या पानांना चिकटत नाही, म्हणूनच मैत्री अनार्य लोकांना चिकटत नाही.) आज आर्य म्हणजे एखादी क्रूर, आक्रमक जमात असल्याचे आपल्यावर बिंबवणे सुरू आहे जे असंयुक्तिक आहे.
ऋग्वेदात आंगिरस, भार्गव, वासिष्ठ, वैश्वामित्र अशा अनेक ऋषींची कुळे आणि नानाविध जमातींची नावे येतात ज्यात तृक्षि (इक्ष्वाकु) सारख्या सूर्यवंशी तर यदु, तुर्वसु, दृह्यू, अनु, पुरु इत्यादि चंद्रवंशी म्हणविणाऱ्या जमातींचा अंतर्भाव होता. यापैकी ऋग्वेदात ३ ऋषीकुळे भरत नामक पुरूंशी संबंधित आहेत जी आंगिरस, वासिष्ठ, वैश्वामित्र अशी. ऋग्वेदात या तीन ऋषीकुळांनी आणि भरत लोकांनी मिळून एकूण ३१ वेळा आर्य शब्द वापरला आहे.
आज जगात १९ भाषाकुळं आहेत ज्यापैकी भारतात ६ भाषाकुळांचे अस्तित्व आढळते ते खालीलप्रमाणे
१) इंडो-युरोपियन (मराठी, हिंदी, गुजराती, नेपाळी, सिंहली, पंजाबी, बंगाली, राजस्थानी, बंगणी इत्यादि)
२) आ᳴स्ट्रो-एशियाटिक (मुंडारी, कोलमुंडा, खासी, संथाली, निकोबारी इत्यादि)
३) सिनो-तिबेटीयन (ईशान्य भारतीय, लडाखी, नागा इत्यादि)
४) द्राविड (तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, तुळू, गोंड, ब्राहुई इत्यादि)
५) बुरुषास्की (गिलगिट, बाल्टिस्तानातील स्थानिक भाषा)
६) अंदमानी (अंदमानातील वनवासीयांची भाषा)
यातील इंडो-युरोपियन, आ᳴स्ट्रो-एशियाटिक, सिनो-तिबेटीयन ही ३ भाषाकुळे जगात इतरत्रही आहेत आणि उर्वरित ३ जी द्राविड, बुरुषास्की, अंदमानी ही केवळ भारतीय उपखंडातच आढळतात.
आता जगात सर्वत्र पसरलेल्या इंडो-युरोपियन भाषाकुळाच्या १२ प्रमुख शाखा आहेत ज्या पुढीलप्रमाणे
१) इंडो-आर्यन
२) इराणीयन
३) अल्बानियन
४) आर्मेनियन
५) ग्रीक
६) बाल्टिक
७) स्लाव्हिक
८) इटॅलीक
९) जर्मनिक
१०) केल्टिक
११) तोखारीयन (आज अस्तित्वात नाही)
१२) ऍनातोलियन/हिटाईक (आज अस्तित्वात नाही)
या १२ शाखा सॅटम, केंटूम या दोन भागात विभागल्या आहेत. उपरोल्लेखित भाषांमध्ये भारतीय भाषा या इंडो-आर्यन कुळातील आहेत ज्यांचे इराणीयन भाषांशी साम्य अधिक असल्याने त्यांस एकत्रितपणे इंडो-इराणीयन म्हणतात.
ऋग्वेद हा आज उपलब्ध इंडो-इराणीयन भाषाकुळातील सर्वात प्राचीन ग्रंथ असून तो वैदिक संस्कृत भाषेत याच भारतभूवर रचला आहे. ऋग्वेदावरून आर्य एतद्देशीय असल्याचे सिद्ध करायला आपल्याला असे म्हणता येईल की
१) आजमितीला असा कोणताही लेखी, पुरातत्वीय पुरावा उपलब्ध नाही जो भारताबाहेर वैदिक अस्तित्व दर्शवेल.
२) ऋग्वेदात सर्व इंडो-युरोपियन शब्दच आहेत, त्यामुळे त्यांचा संबंध द्राविडी लोकांशी आला नाही हे लक्षात येते आणि जर संबंध येत नाही तर AIT/AMT म्हणते तसे आर्यांनी द्राविडी लोकांना दक्षिणेकडे ढकलण्याचा विषयच उद्भवत नाही.
३) ऋग्वेदात येणारी नद्यांची नावे अजूनही तीच आहेत, जर ते बाहेरील असते तर जुनी, स्थानिक भाषांतील नावे का नाहीत ?
४) आर्य बाहेरून आले असते तर त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वीच्या संस्कृती, जीवन, प्रदेशाच्या जुन्या स्मृती का नाहीत ?
आता AIT/AMT च्या तत्वांचे खंडन करणे क्रमप्राप्त ठरते.
१) AIT/AMT समर्थक म्हणतात की
१. इंडो-युरोपियन भाषांचे मूळ भारतात नाही.
२. ऋग्वेदात आर्य आगमनाचे पुरावे आहेत.
ऋग्वेदात शत्रूसाठी फक्त एकदाच अनास (अन् + आस) असा शब्द आला आहे ज्याचा वास्तविक अर्थ अस्पष्ट बोलणारा असा आहे. पण आर्य बाहेरून आले हे सिद्ध करताना AIT/AMT समर्थक म्हणतात की अनास म्हणजे चपट्या नाकाचे लोक जे येथील मूलनिवासी असून लांब नाकाच्या (युरोपीय लोकांसारखे) आर्यांनी त्यांना हाकलले.
२) वैदिक संस्कृत भाषा ही प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेस सर्वात जवळची आहे. चाईल्डने ७२ प्रोटो-इंडो-युरोपियन शब्दांची सूची दिली आहे ज्यांपैकी इंडो-युरोपियन भाषांमध्ये पुढीलप्रमाणे शब्द आढळले.
संस्कृत - ७०
ग्रीक - ४८
जर्मनिक - ४६
लॅटिन - ४०
बाल्टिक - २५
स्लाव्हिक - २३
आर्मेनियन - १६
तोखारीयन - ८
जर प्रोटो-इंडो-युरोपियनचे मूळ दक्षिण रशिया असते तर तेथील स्लाव्हिक भाषाकुळामध्ये सर्वाधिक शब्द समान असायला हवे होते पण त्याउलट संस्कृतमध्ये सर्वाधिक साम्य दिसते.
वैदिक संस्कृत, ग्रीक भाषांमध्ये शब्दांस विशिष्ट लय आहे जो पाणिनीय संस्कृतमध्ये बरेचदा जाणवत नाही.
तसेच वैदिक, ग्रीक, जर्मन, हिटाईट देवतांमध्ये साम्य आहे. (जर्मन आणि ग्रीकमध्ये परस्पर साम्य क्वचितच दिसते हेही महत्वाचे), तर इराणीयनचे साम्य वैदिकशीच आहे. इराणीयन आणि इंडो-आर्यन लोकांनी दक्षिण रशिया सोबत सोडले असे AIT/AMT म्हणते पण तसे असल्यास जे साम्य वैदिक संस्कृतीचे इतरांशी आहे तसेच इराणीयनचे असायलाच हवे होते. वेदांत जौस पितर ही देवता आहे, ग्रीकमध्ये झुस पातेर तर रोमनमध्ये ज्युपिटर बनते. यापैकी ग्रीक, रोमन या देवता असून वैदिक देवतेचाच निसर्गाशी सर्वात जवळचा अगदीच प्राथमिक संबंध आहे.
म्हणजे मूळस्थान इंडो-आर्यन भाषेला जवळच असणार. कारण मूळस्थान दक्षिण रशियात असते तर तिथून भारतात येईपर्यंत स्थानिक लोकांशी सांस्कृतिक संबंध येऊन त्यांची संस्कृती स्वीकारत इंडो-आर्यन लोकांमध्ये अनेक बदल व्हायला हवे होते जे दिसत नाहीत.
३) AIT/AMT विरुद्ध दुसरा मतप्रवाह म्हणजे Out of India Theory (OIT) ज्यांचे म्हणणे की मूळस्थान भारत असून इथूनच इंडो-युरोपियन भाषा बाहेर पडल्या. पण बाहेर जाताना त्या कोणत्या स्वरूपात होत्या यावरून या मताचे २ प्रकार आहेत
१. संस्कृत भारताबाहेर गेली असे मानणारे :
अर्थात संस्कृतचे भारताबाहेरील नगण्य अस्तित्व बघूनच याचे खंडन होते.
२. प्रोटो-इंडो-युरोपियन भारताबाहेर गेली असे मानणारे :
यावर विरोध दर्शविताना AIT/AMT समर्थक म्हणतात जर प्रोटो-इंडो-युरोपियन मूळची भारतात होती तर १२ इंडो-युरोपियन भाषाकुळांपैकी १ संस्कृतच इथे शिल्लक राहून ११ भाषाकुळं बाहेर जाणे शक्य नाही. पण जर दक्षिण रशिया मूळस्थान मानले तरी हेच म्हणावे लागेल की तिथे एक भाषाकुळ राहून इतर ११ बाहेर गेले त्यामुळे विरोध करायचा प्रश्न नाही.
अल्बानियन, आर्मेनियन, इराणीयन, इंडो-आर्यन, ग्रीक या भाषाकुळांतील संबंध बघून कळते की या भाषा सर्वात शेवटी मूळस्थान सोडून गेल्या जे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. म्हणजे आता मूळस्थान यांच्याच जवळ कुठेतरी असणार. जर दक्षिण रशिया मूळ असते तर स्लाव्हिक भाषाकुळ जे तिथे आज आहे ते हा भाग सोडून जाऊन परत तिथे आले म्हणावे लागेल जे शक्य नाही.
इंडो-युरोपियन भाषांचे सॅटम आणि केंटूम हे दोन प्रकार आहेत. आज सर्व इंडो-आर्यन भाषा सॅटम आहेत आणि युरोपात मात्र दोन्ही प्रकार आहेत. त्यामुळे असे मत होते की मूळस्थान युरोपात असेल पण या मतास तडा तेव्हा गेला जेव्हा बंगणी भाषा (उत्तराखंड) आणि मध्य आशियात लुप्त झालेले तोखारीयन हे भाषाकुळ केंटूम आहे असे सिद्ध झाले.
AIT/AMT समर्थक म्हणतात की भारतात द्राविड, आ᳴स्ट्रो-एशियाटिक भाषा असताना मूळस्थान भारत कसे असणार ? पण जसे इंग्लिश ही मूळची इंग्लंडची भाषा जी आज अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बोलली जाते आणि मूळच्या इंग्लंडमध्ये मात्र आजही आयरिश, वेल्स, स्कॉटीश वगैरे भाषा आहेत जे उपरोक्त तर्क चूक ठरवते. तसेच दक्षिण रशियातही इंडो-युरोपियन नसलेल्या युरालिक, अल्टाईक, कॉकसीन वगैरे भाषा आहेतच.
द्राविडी भाषक येथील मूळनिवासी होते हे दाखवताना AIT/AMT समर्थक म्हणतात की बलुचिस्तानात अजूनही द्राविडी कुळातील ब्राहुई लोक आहेत जे आर्यांनी हाकलूनही गेले नाहीत पण आज हेही सर्वमान्य आहे की ब्राहुई दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले आहेत. त्यामुळे AIT/AMT चा हा तर्कही फोल ठरतो.
४) अजूनही उत्तर भारत, पाकिस्तानच्या भागात जिथे आर्यांनी आक्रमण केले म्हणतात तिथे भौगोलिक घटकांची नावे संस्कृतच आहेत, जसे अमेरिकेत मिसिसिपी, शिकागो ही रेड इंडियन नावे आहेत किंवा लंडन वगैरे जसे इंग्लिश पूर्व काळापासून आहेत तसेच. किंबहुना युरोपीय नद्यांची नावे इंडो-युरोपियन पूर्वीची आहेत पण ऋग्वेदात येणारी नद्यांची नावे अजूनही तीच आहेत, जर इंडो-आर्यन बाहेरील असते तर जुनी, स्थानिक भाषांतील नावे उपलब्ध का नाहीत ?
५) पूर्व युरोपातील युरालिक भाषा (ज्या इंडो-युरोपियन नाहीत) जशा फिनिक, हंगेरीयन आदींमध्ये इंडो-इराणीयन शब्द विपुल आहेत ज्यावरून इंडो-इराणीयन तिथून आल्याचा तर्क लावला गेला. हे खोटे यावरून सिद्ध होते की इंडो-इराणीयनमध्ये युरालिक शब्द नाहीत म्हणजेच हे लोक तिथून आलेले नाहीत. उलट इराणीयन लोकांचे समूह पूर्व युरोपात गेले ज्यांच्याकडून या युरालिक भाषांनी शब्द घेतले. इंग्रजांनी जगभरात जाऊन इंग्लिश शब्द इतर भाषांना दिले आणि त्यांचे आपल्या भाषेत घेतले पण कायमस्वरूपी बाहेर स्थायिक न होता त्यांनी स्वदेशी जाऊन ते शब्द आपल्या भाषेत आधी रूढ केले म्हणून इंग्लिशमध्ये इतर भाषांचे आणि इतर भाषांमध्ये इंग्लिश शब्द आढळतात. याविरुद्ध दोन शतकांपूर्वी भारतातून फिजी, मॉरिशस तर पूर्वी आग्नेय आशियात गेलेल्या लोकांनी अशी देवाणघेवाण केली पण तिकडील स्थानिक शब्द आपल्या मायदेशी परत येऊन मूळ भाषेत मिसळले नाहीत कारण ते विदेशातच स्थायिक झाले. तसेच इथेही युरालिक लोकांचे झाले की इंडो-इराणीयन शब्द युरालिक भाषांमध्ये आहेत पण युरालिक भाषांचे या इंडो-इराणीयनमध्ये नाहीत. मध्य आशियातील आणि भारतीय पशूंची नावेही युरालिक भाषांमध्ये आहेत जरी तिथे ते पशु नसले तरी. ही नावे इतर युरोपीय भाषांमध्ये दिसत नाहीत.
६) AIT/AMT समर्थक म्हणतात की जर भारतातुन आर्य युरोपात गेले तर भारतीय वाघ, सिंह, झाडांची नावे युरोपियन भाषांमध्ये का नाहीत ? पण हे असत्य ठरवायला जिप्सी भाषा पुरेशी आहेत. या लोकांनी ख्रिस्तपूर्व ३०० च्या सुमारास भारत सोडूनही आज त्यांच्यात इंडो-आर्यन नावे नाहीत.
यावरून सिद्ध होते की भाषाशास्त्रानुसार आर्य भरताबाहेरून आलेले आक्रमक नसून एतद्देशीय रहिवासी होते.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक १

 

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक १
आजपासून जवळपास ३०० वर्षांपूर्वी आर्य-द्रविड आणि कोण एतद्देशीय कोण परकीय असा वाद नव्हता, किंबहुना, आज प्रचलित असलेला अर्थही या शब्दांना मुळीच नव्हता. मग या वादाचा उगम कसा झाला ?
युरोप तथा भारत यांचा संबंध आपल्याला अगदी प्राचीन काळापासून दिसतो. सातवाहन काळात रोमपर्यंत व्यापार चालायचा हे सर्वश्रुत आहे. पण इस्तान्बुल नगर ऑटोमन (ओस्मानी) तुर्कांनी जिंकले आणि त्यानंतर समुद्री मार्गाने भारताकडे येण्याने इतिहासास कलाटणी मिळाली. याच काळात युरोपात अनेक वैचारिक क्रांतींचे बीज रोवले जात होते ज्याचा कित्येक क्षेत्रांवर प्रभाव पडला, आणि विविध शास्त्रांच्या अभ्यासाला वेगळे वळण मिळाले.
या आणि या नंतरच्या भारतात आलेल्या युरोपीय लोकांना उत्तर भारतीय (महाराष्ट्र-गोवा सह), इराणच्या, युरोपीय भाषांमध्ये परस्पर सादृश्य आणि साधर्म्य जाणवू लागले. हे साधर्म्य थोडो-थोडके, वरवरचे आणि काही विशिष्ट शब्दांत नसून अतिशय मूलभूत शब्द, धातु, प्रत्यय, व्याकरण या सर्व बाबींत होते. निरीक्षणावरून साहजिकच या सर्व भाषांचे मूळ एकच असावे असा अंदाज त्यांनी लावला. या भाषाकुळास संबोधनाच्या सोयीसाठी, आधी इंडो-जर्मानिक (Indo-Germanisch) आणि नंतर इंडो-युरोपीयन (Indo-European) असे नाव देण्यात आले.
सुरुवातीला सर्वात प्राचीन आणि व्यापक असल्यामुळे संस्कृत हीच भाषाकुळाची जननी आहे असे त्यांना वाटले, ज्यानुसार भारतातून हे लोक जगभरात पसरले असावेत असा अंदाज त्यांनी बांधला. संस्कृत भाषेतील वेद हे या इंडो-युरोपीयन भाषाकुळातील सर्वात जुने साहित्य असून त्यात वैदिक जनांसाठी 'आर्य' हा शब्द वापरला गेला आहे. त्यावरून या भाषाकुळाच्या भाषकांसाठी त्यांनी आर्य (Aryan) हे नाव वापरण्यास सुरुवात केली.
कालौघात भाषातज्ज्ञांना उच्चारशास्त्र आणि व्याकरणाच्या अभ्यासावरून संस्कृत हे मूळ नसून संस्कृतहूनही जुनी कोणती तरी भाषा इंडो-युरोपीयन भाषाकुळाचे मूळ असावी असे वाटू लागले. तेव्हा संस्कृतसकट युरोपीयन भाषाकुळाचे मूळ असलेल्या या अज्ञात भाषेला त्यांनी प्रोटो-इंडो-युरोपियन (Proto-Indo-European) असे नाव दिले.
ज्या भाषांमध्ये साम्य आढळून आले अशा युरोपीय इंग्रजी, जर्मन पासून ते उत्तर भारतीय हिंदी, बंगाली तथा दक्षिणेकडील मराठी, कोंकणी आणि थेट श्रीलंकेतील सिंहलीपर्यंत या समस्त भाषा एकाच इंडो-युरोपियन भाषापरिवारातील जर आहेत तर कधीकाळी इंग्लंडपासून श्रीलंकेपर्यंत प्रोटो-इंडो-युरोपियन ही एकच भाषा बोलले जाणे शक्य नाही हेही तर्कसंगत जाणवले. कारण दक्षिण भारतात द्राविड, आ᳴स्ट्रो-एशियाटिक इत्यादि भाषाकुळातील भाषा बोलल्या जात. तेव्हा, प्रोटो-इंडो-युरोपियन भाषक ज्या ठिकाणाहून सर्वत्र पसरले असावेत त्या देशास अभ्यासक प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड म्हणजे मूळस्थान असे म्हणू लागले.
हे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड मूळस्थान कुठे तरी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच दक्षिण रशियात असावे असा आधारहीन विचार यातून काही अभ्यासकांनी केवळ आपल्या तर्कशक्तीच्या विस्तारावर मांडला. यामुळे वेद रचणारे संस्कृतभाषक आर्य म्हणवले जाणारे लोक बाहेरून भारतात आले असा मतप्रवाह रूढ झाला. आणि इंग्रजांच्या काळात त्यांच्या पथ्यावर पडत असल्यामुळे तो आणखीन प्रबळ करण्यात आला. या आर्य बाहेरून आले असे अंदाज लावणाऱ्या मतास Aryan Invasion Theory (AIT/AMT) म्हणतात. त्याचेच एक गोंडस स्वरूप म्हणजे Aryan Migration Theory (AMT).
या मताची काही प्रमुख विधाने आहेत
१) युरोपीय, उत्तर भारतीय, मध्य आशियातील अनेक भाषांमध्ये साम्य आहे.
२) या सर्व भाषांचे मूळ एक असेल ज्यास प्रोटो-इंडो-युरोपियन म्हणता येईल.
३) प्रोटो-इंडो-युरोपियन ही भाषा एका विशिष्ट ठिकाणी विकसित झाली ते स्थान म्हणजे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड.
४) हे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड कुठे तरी दक्षिण रशियात असावे, म्हणजे वेद रचणारे आर्य बाहेरून भारतात आले.
उपरोक्त पहिली ३ विधाने संयुक्तिक असली तरीही चौथे विधान का निराधार आहे हे भाषाशास्त्र, ऋग्वेदीय वाङ्मय, पुरातत्वशास्त्र इत्यादि काही महत्वपूर्ण घटकांवरून पुढे इतिहास आणि भाषा संशोधक श्रीकांत तलगेरी यांनी कसे सिद्ध केले आहे हे आपण पुढे बघू.
____
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com

#पातावत #राठौड़

 


#पातावत
#राठौड़
मारवाड नरेश राव रिड़मलजी के 24 पुत्र थे
रिड़मलजी के पुत्र राव जोधोजी ने जोधपुर कि स्थापना की.
राव रिड़मलजी के पुत्र राव पातोजी पाली रोड पर स्तिथ #चौटीला ठिकाणे कि नीव सवत् 1483 कार्तिक सुदी सातम को रखी
राव पातोजी के वंशज पातावत हुवे
पातोजी के दो पुत्र
1.राव लुम्बोजी
2.राव हमीरसिह जी
हमीरसिह मा करणी के परम भक्त थे
मा करणी जी कि आज्ञा से हमीर सिह जी मा के साथ चोटिला छोड़ कर निकल गये
तथा मा करणी ने सवत् 1532 माघ सुदी सातम को करणु कि नीव रखी(छड़ी रोपी)
करणु ठा.हमीर सिह के 3 पुत्र हुवे
1.गगोजी ....हतुण्डी ठिकाणा
2.रतनसिह.... करणु
3.सबलसिह...जोधयासी ठिकाणा
#रतन सिह
रतनसिह के भी तीन पुत्र थे जो मला,कला,जयमला के नाम से प्रसिद्ध हुए
1.मलोजी..वापस चोटिला गये
2.कलोजी....करणु
3.जयमल....पडियाल ठिकाणा
>>>
प्रिथमी सारी पालटी, बास बसै बीकांण ।
पाता कदै न पालटै, भीम जिसा कुलभांण ॥
मलां कलां जयमलां, तूं रिड़मलां रूप ।
नाहर भीमै नांव रौ, भलौ सरावण भूप ॥
कलोजी करणु के 9 पुत्र हुए
1.रामसिहजी...घटियाली ठिकाणा
2.नागराजसिह...करणु ठिकाणा
3.रणछोड़दास....आऊ ठिकाणा
4.हरीदासजी ....कैरला ठिकाणा
5.जसवंतसिह...चाडी,पलीना ठिकाणा
6.अखेराज..हिल्ली-किजरी
7.भगवानदास .....मिठडीयो ठिकाणा
8.फतेसिह...रोहिणा ठिकाणा
9.सुजानसिह....अगुणा गाव(पीपासर के आसपास)
नागराजजी करणु
नगराजजी के 4पुत्र थे
जिनमे मेघराजसिह करणु ठाकुर हुए
करणु के पातावत मेघराजसिह के वशंज है
मेघराजसिह दानवीर और सुशासन ठाकुर थे
करणु और आसपास के क्षेत्र में1630 से1637तक भयंकर अकाल पड़ा
इस दौरान मेघराज सिंह ने अपना सारा खजाना जनता के लिए खोल दिया
तथा आकाल राहात के तोर पर मड़ली नाडी (तालाब) का निर्माण करवाया
इस दौरान ठाकुरायणसा रायकवर
ने खजाना खाली हो जाने के दौरान अपने पास जमा कुछ पूंजी को भी जनता के लिए दे दिया
और जेसोलाई तालाब का निर्माण करवा के जनता को रोजगार दिया
रायकवर जैसा भाटी थे इसी के उपलक्ष में जैसोलाई नाम रखा गया
जिसकी खुदायी मे 2200रू. लगे जो आज 2200करोड़ के बराबर है
मेघराज सिह के 8पुत्र थे
जिसमे 6 नम्बर पर था वीर रुपसिह
गाव के एक गरिब किसान की जब गाये मीणा चुरा ले गये तब रुपसिहजी ने देऊ गाव के निकट सवत्1704 मे मीणो को ललकारा और भयंकर युध्द हुआ जिस मे रुपसिह जी का सर कट गया पर वो वीरता से लड़ते हुए गाये करणु ले आये तथा वीरगति को प्राप्त हुए
रुपसिह झुजार की पुजा होने लगी
रुपसिह के बाद अगली ही पीड़ी मे विख्यात वीर मौखमसिह जी हुवे
मौखमसिह जी ने नवाब खुरम से कई दिनो तक युध्द किया और नवाब को मार भगाया नवाब कि सैना से लड़ने वाले मौखमसिह सर कट जाने पर भी लड़रहे थे
मौखमसिह जी का घोड़ा सवत् 1850 मंगसर मास बदी2 (दुज )को करणु मे प्रवेश करता है जिस पर दोनों हाथों में तलवार लिए हुए वीर मौखमसिह का सर रहीत धड़ विराज मान था
गाव कि आखे नम थी छाती गर्व से फट रही थी लब्जो पर मौखमसिह के जयकारे....
नमन करता हु दादोसा वीर झुजार मौखम सिह जी को
मौखमसिह जी के दो पुत्र
करणु वीरो कि धरा है
यह वह धरा है जहां कई महापुरुषों के चरण पड़े
करणी मा के द्वारा खुदवाया गया कुआं करणु में आज भी मौजूद है
महान संत देवोजी महाराज व जिया राम जी महाराज की तपस्या स्थली है करणु
क्षेत्रफल की दृष्टि से 1990तक एशिया का दूसरा बड़ा गांव था करणु
जोधपुर बीकानेर और नागौर तीनों की सीमा से लगता है वर्तमान में 4 पंचायत और 10 से ज्यादा राजस्व गांव मैं विराजमान है मेरा करणु!
लेखक...मगसिह पातावत करणु

कुमार स्कन्दगुप्त का भारत

 


कुमार स्कन्दगुप्त का भारत
हूण जाति की नृशंसता इतनी थी कि चीन से लेकर महान रोमन साम्राज्य तक काँप उठे थे। इस अकेली बर्बर जाति का आतंक इतना था कि उसने उस समय के किसी भी बड़े साम्राज्य को रौंदे बिना नहीं छोड़ा।
चीन का विशाल साम्राज्य तो इतना भयाक्रांत हुआ कि उसने हूणों से लड़ने का विचार ही छोड़ दिया और रक्षात्मक होकर खुद को ऊँचे ऊँचे सैकड़ों किलोमीटर की दीवार से घेर लिया।
जब चीन आत्मसमर्पित हुआ तो ये हूण अपनी एक टुकड़ी के साथ यूरोप की ओर दौड़ पड़ा। "आटिला" नाम के उसके सेनापति ने पोलैंड को मिट्टी में मिला दिया फिर एक एक कर यूरोप के बाकी देशों में खून की नदियाँ बहा दी। इन हूणों के कारण विशाल रोमन साम्राज्य मिट्टी में मिल गया तो इस विजयोन्माद में उन हूणों की टुकड़ी ने भारत का भी रुख किया और गांधार प्रदेश पहुँच गये।
वहां विजय प्राप्त कर जब वो सिंध को निगलने आगे बढ़े तो वहां उसे रोकने के लिए वैदिक सूर्य कुमारगुप्त का महान प्रतापी राज्य खड़ा था।
कुमारगुप्त ने इन बर्बर हूणों के समूल नाश के लिए किसी और सेनापति को न भेजकर अपने पुत्र राजकुमार स्कंद को भेजा। हूणों की विशाल और बर्बर टोली को स्कंद ने रौंद दिया और जन वो हूणजयी होकर पाटलिपुत्र लौटे तो वहां उनके स्वागत में वृद्ध पिता कुमारगुप्त ने अश्वमेध यज्ञ किया।
फिर कुमारगुप्त के स्वर्गवासी होने के बाद स्कंद भारत के सम्राट बने।
स्कंद के शासन के उत्तरार्ध में हूणों ने फिर से अपनी शक्ति संकलित की और "खिंखिल" नाम के सेनापति के नेतृत्व में फिर से भारत पर हमलावर हो गया। भारत की सेना शुरुआत में जब परास्त होने लगी तो स्कंद स्वयं ही सेना का संचालन करने पश्चिम भारत की ओर चल पड़े। उधर वो युद्ध में हूणों से जूझ रहे थे और इधर उनके धूर्त भाई पुरुगुप्त ने सत्ता पर छल से कब्जा कर लिया।
सत्ता हड़पे जाने की सूचना महाराज स्कंद को पहुँचा तो उनके सामने दो रास्ते थे।
एक था कि वापस जाकर अपने सौतेले भाई से वापस सत्ता छीन लें और दूसरा ये कि हूणों को युद्ध में धूल चटाये।
महान सम्राट विक्रमादित्य के पौत्र और हिन्दू धर्मध्वजा रक्षक सम्राट स्कंद ने दूसरा विकल्प चुना और युद्ध भूमि में वीरगति को प्राप्त हुये।
दूसरा विकल्प इसलिये चुना क्योंकि अगर वो सत्ता की सोचते और लौट जाते तो बर्बर हूणों के कारण न जाने कितने लोगों को अपनी जान देनी पड़ती, न जाने कितनी ललनाओं की इज़्ज़त लूटी जाती और न जाने कितने देवालय टूटते।
पहले अपनी सत्ता और फिर अपने प्राण की बलि देकर स्कंद ने सबको बचा लिया और मृत्यु पाकर अमर हो गये।
पाटलिपुत्र का महान वैभवशाली सम्राट अपनी राजधानी से हजारों किलोमीटर दूर पंजाब में बलिदान हुये पर बलिदान होने से पहले उन्होंने हूण सेनापति "खिंखिल" को भारत की सीमा से मीलों दूर खदेड़ दिया और धर्म तथा राष्ट्र की सुरक्षा सुनिश्चित की।
स्कंद का व्यक्तित्व चरित्र और राष्ट्रीय चरित्र उन सबके लिए पाथेय है जो सत्ता को सब कुछ समझते हुये राष्ट्र और धर्म की सुरक्षा से मुँह मोड़ लेते हैं पर दुर्भाग्य कि भारत में किसी ने इतिहास से न तो कभी कुछ सीखा और न सीखेंगे।
और ये हो भी क्यों न क्योंकि आज भारत में कितने हैं जिन्हें महान सम्राट स्कंद की ये गाथा याद है और अगर नहीं है तो फिर किसी और से ये उम्मीद करना कि उनका चरित्र स्कंद के चरित्र का अनुगमन करेगा हास्यास्पद ही हैं।

Friday, 20 October 2023

#महाराज_विक्रमादित्य

 

भारत को सोने की चिड़िया बनाने वाला असली राजा कौन था ?
कौन था वह राजा जिसके राजगद्दी पर बैठने के बाद उनके #श्रीमुख से #देववाणी ही निकलती थी और देववाणी से ही न्याय होता था?
कौन था वह राजा जिसके राज्य में अधर्म का संपूर्ण नाश हो गया था।

#महाराज_विक्रमादित्य
बड़े ही दुख की बात है कि महाराज विक्रमादित्य के बारे में देश को लगभग शून्य बराबर ज्ञान है। जिन्होंने भारत को सोने की चिड़िया बनाया था और स्वर्णिम काल लाया था।
#उज्जैन के राजा थे गन्धर्वसैन , जिनके तीन संताने थी , सबसे बड़ी लड़की थी मैनावती , उससे छोटा लड़का भृतहरि और सबसे छोटा वीर विक्रमादित्य...बहन मैनावती की शादी धारानगरी के राजा पदमसैन के साथ कर दी , जिनके एक लड़का हुआ गोपीचन्द , आगे चलकर गोपीचन्द ने श्री ज्वालेन्दर नाथ जी से योग दीक्षा ले ली और तपस्या करने जंगलों में चले गए, फिर मैनावती ने भी श्री गुरू गोरक्ष नाथ जी से योग दीक्षा ले ली।
आज ये देश और यहाँ की संस्कृति केवल विक्रमादित्य के कारण अस्तित्व में है।
अशोक मौर्य ने बोद्ध धर्म अपना लिया था और बोद्ध बनकर 25 साल राज किया था।
भारत में तब सनातन धर्म लगभग समाप्ति पर आ गया था, देश में बौद्ध और अन्य हो गए थे।
#रामायण, और #महाभारत जैसे ग्रन्थ खो गए थे, महाराज विक्रम ने ही पुनः उनकी खोज करवा कर स्थापित किया।
#विष्णु और #शिव जी के मंदिर बनवाये और सनातन धर्म को बचाया विक्रमादित्य के 9 रत्नों में से एक कालिदास ने अभिज्ञान शाकुन्तलम् लिखा। जिसमे भारत का इतिहास है अन्यथा भारत का इतिहास क्या मित्रो हम भगवान् कृष्ण और राम को ही खो चुके थे। हमारे ग्रन्थ ही भारत में खोने के कगार पर आ गए थे।
उस समय उज्जैन के राजा भृतहरि ने राज छोड़कर श्री गुरू गोरक्ष नाथ जी से योग की दीक्षा ले ली और तपस्या करने जंगलों में चले गए, राज अपने छोटे भाई विक्रमादित्य को दे दिया. वीर विक्रमादित्य भी श्री गुरू गोरक्ष नाथ जी से गुरू दीक्षा लेकर राजपाट सम्भालने लगे और आज उन्ही के कारण सनातन धर्म बचा हुआ है, हमारी संस्कृति बची हुई है।
महाराज विक्रमादित्य ने केवल धर्म ही नही बचाया उन्होंने देश को आर्थिक तौर पर सोने की चिड़िया बनाई, उनके राज को ही भारत का स्वर्णिम राज कहा जाता है।
विक्रमादित्य के काल में भारत का कपडा, विदेशी व्यपारी सोने के वजन से खरीदते थे।
भारत में इतना सोना आ गया था की, विक्रमादित्य काल में सोने की सिक्के चलते थे। आप गूगल इमेज कर विक्रमादित्य के सोने के सिक्के देख सकते हैं।
कैलंडर जो विक्रम संवत लिखा जाता है वह भी विक्रमादित्य का स्थापित किया हुआ है।
आज जो भी ज्योतिष गणना है जैसे , हिन्दी सम्वंत , वार , तिथीयाँ , राशि , नक्षत्र , गोचर आदि उन्ही की रचना है , वे बहुत ही पराक्रमी , बलशाली और बुद्धिमान राजा थे।
कई बार तो देवता भी उनसे न्याय करवाने आते थे।
विक्रमादित्य के काल में हर नियम धर्मशास्त्र के हिसाब से बने होते थे। न्याय , राज सब धर्मशास्त्र के नियमो पर चलता था। विक्रमादित्य का काल प्रभु श्रीराम के राज के बाद सर्वश्रेष्ठ माना गया है, जहाँ प्रजा धनी थी और धर्म पर चलने वाली थी।
बड़े दुःख की बात है की भारत के सबसे महानतम राजा विक्रमादित्य के बारे में हमारे स्कूलों कालेजों मे कोई स्थान नही है। देश को अकबर, बाबर, औरंगजेब जैसै दरिन्दो का इतिहास पढाया जा रहा है।

उज्जैन के सम्राट विक्रमादित्य


 

#भारत में #चक्रवर्ती #सम्राट उसे कहा जाता है
जिसका संपूर्ण #भारत में राज रहा है।
#ऋषभदेव के पुत्र #राजा_भरत पहले #चक्रवर्ती_सम्राट थे,जिनके नाम पर ही इस #अजनाभखंड
का नाम #भारत पड़ा।
परवर्तीकाल में शकुंतला एवं दुष्यंत के भरत
नाम के पुत्र हुए।
उज्जैन के सम्राट विक्रमादित्य भी चक्रवर्ती
सम्राट थे।
विक्रमादित्य का नाम विक्रम सेन था।
विक्रम वेताल और सिंहासन बत्तीसी की
कहानियां महान सम्राट विक्रमादित्य से
ही जुड़ी हुई है।
सम्राट विक्रमादित्य गर्दभिल्ल वंश के शासक
थे इनके पिता का नाम राजा गर्दभिल्ल था।
सम्राट विक्रमादित्य ने शको को
पराजित किया था।
उनके पराक्रम को देखकर ही उन्हें महान
सम्राट कहा गया और उनके नाम की उपाधि
कुल 14 भारतीय राजाओं को दी गई ।
"विक्रमादित्य" की उपाधि भारतीय इतिहास में
बाद के कई अन्य राजाओं ने प्राप्त की थी,
जिनमें गुप्त सम्राट चन्द्रगुप्त द्वितीय और सम्राट
हेमचन्द्र विक्रमादित्य(जो हेमु के नाम से प्रसिद्ध थे)
उल्लेखनीय हैं।
राजा विक्रमादित्य नाम, 'विक्रम' और 'आदित्य'
के समास से बना है जिसका अर्थ 'पराक्रम का
सूर्य' या 'सूर्य के समान पराक्रमी' है।
उन्हें विक्रम या विक्रमार्क (विक्रम + अर्क) भी
कहा जाता है (संस्कृत में अर्क का अर्थ सूर्य है)।
विक्रमादित्य का परिचय : विक्रम संवत अनुसार
विक्रमादित्य आज से 2288 वर्ष पूर्व हुए थे।
नाबोवाहन के पुत्र राजा गंधर्वसेन
भी चक्रवर्ती सम्राट थे।
राजा गंधर्व सेन का एक मंदिर मध्यप्रदेश के
सोनकच्छ के आगे गंधर्वपुरी में बना हुआ है।
यह गांव बहुत ही रहस्यमयी गांव है।
उनके पिता को महेंद्रादित्य भी कहते थे।
उनके और भी नाम थे जैसे गर्द भिल्ल,
गदर्भवेष।
गंधर्वसेन के पुत्र विक्रमादित्य और भर्तृहरी थे।
विक्रम की माता का नाम सौम्यदर्शना था
जिन्हें वीरमती और मदनरेखा भी कहते थे।
उनकी एक बहन थी जिसे मैनावती कहते थे।
उनके भाई भर्तृहरि के अलावा शंख और अन्य
भी थे जो अन्य माताओं के पुत्र थे।
उनकी पांच पत्नियां थी,मलयावती,मदनलेखा,
पद्मिनी, चेल्ल और चिल्लमहादेवी।
उनकी दो पुत्र विक्रमचरित और विनयपाल
और दो पुत्रियां प्रियंगुमंजरी (विद्योत्तमा)और
वसुंधरा थीं।
गोपीचंद नाम का उनका एक भानजा था।
प्रमुख मित्रों में भट्टमात्र का नाम आता है।
राज पुरोहित त्रिविक्रम और वसुमित्र थे।
मंत्री भट्टि और बहसिंधु थे।
सेनापति विक्रमशक्ति और चंद्र थे।
कलि काल के 3000 वर्ष बीत जाने
पर 101 ईसा पूर्व सम्राट विक्रमादित्य
का जन्म हुआ।
उन्होंने 100 वर्ष तक राज किया।
-(गीता प्रेस,गोरखपुर भविष्यपुराण,पृष्ठ 245)।
विक्रमादित्य भारत की प्राचीन नगरी उज्जयिनी
के राजसिंहासन पर बैठे।
विक्रमादित्य अपने ज्ञान,वीरता और उदारशीलता
के लिए प्रसिद्ध थे जिनके दरबार में नवरत्न रहते थे।
कहा जाता है कि विक्रमादित्य बड़े पराक्रमी
थे और उन्होंने शकों को परास्त किया था।
सम्राट विक्रमादित्य अपने राज्य की जनता के
कष्टों और उनके हालचाल जानने के लिए छद्मवेष
धारण कर नगर भ्रमण करते थे।
राजा विक्रमादित्य अपने राज्य में न्याय व्यवस्था
कायम रखने के लिए हर संभव कार्य करते थे।
इतिहास में वे सबसे लोकप्रिय और न्यायप्रीय
राजाओं में से एक माने गए हैं।
कहा जाता है कि मालवा में विक्रमादित्य के
भाई भर्तृहरि का शासन था।
भर्तृहरित के शासन काल में शको का आक्रमण
बढ़ गया था।
भर्तृहरि ने वैराग्य धारण कर जब राज्य त्याग
दिया तो विक्रम सेना ने शासन संभाला और
उन्होंने ईसा पूर्व 57-58 में सबसे पहले शको
को अपने शासन क्षेत्र से बहार खदेड़ दिया।
इसी की याद में उन्होंने विक्रम संवत की
शुरुआत कर अपने राज्य के विस्तार का
आरंभ किया।
विक्रमादित्य ने भारत की भूमि को विदेशी
शासकों से मुक्ति कराने के लिए एक वृहत्तर
अभियान चलानाय।
कहते हैं कि उन्होंने अपनी सेना की फिर से
गठन किया।
उनकी सेना विश्व की सबसे शक्तिशाली सेना
बई गई थी,जिसने भारत की सभी दिशाओं में
एक अभियान चलाकर भारत को विदेशियों
और अत्याचारी राजाओं से मुक्ति कर एक
छत्र शासन को कायम किया।
आप वैदिक #शंका और #समाधान के लिए व्हाट्सएप कर सकते हैं या आप हमसे जुड़ सकते हैं
9999279279 #आर्य वरदान धर्मयोद्धा कर्मवीर
कल्हण की 'राजतरंगिणी' के अनुसार 14 ई. के
आसपास कश्मीर में अंध्र युधिष्ठिर वंश के राजा
हिरण्य के नि:संतान मर जाने पर अराजकता
फैल गई थी।
जिसको देखकर वहां के मंत्रियों की सलाह से
उज्जैन के राजा विक्रमादित्य ने मातृगुप्त को
कश्मीर का राज्य संभालने के लिए भेजा था।
नेपाली राजवंशावली अनुसार नेपाल के राजा
अंशुवर्मन के समय (ईसापूर्व पहली शताब्दी)
में उज्जैन के राजा विक्रमादित्य के नेपाल
आने का उल्लेख मिलता है।
राजा विक्रम का भारत की संस्कृत,प्राकृत,
अर्द्धमागधी,हिन्दी,गुजराती,मराठी,बंगला
आदि भाषाओं के ग्रंथों में विवरण मिलता है।
उनकी वीरता,उदारता,दया,क्षमा आदि गुणों
की अनेक गाथाएं भारतीय साहित्य में भरी पड़ी हैं।
नवरत्नों को रखने की परंपरा महान सम्राट
विक्रमादित्य से ही शुरू हुई है जिसे तुर्क बादशाह
अकबर ने भी अपनाया था।
सम्राट विक्रमादित्य के नवरत्नों के नाम धन्वंतरि,
क्षपणक,अमरसिंह,शंकु,बेताल भट्ट,घटखर्पर,
कालिदास, वराहमिहिर और वररुचि कहे जाते हैं।
इन नवरत्नों में उच्च कोटि के विद्वान,श्रेष्ठ कवि,
गणित के प्रकांड विद्वान और विज्ञान के विशेषज्ञ
आदि सम्मिलित थे।
देश में अनेक विद्वान ऐसे हुए हैं,जो विक्रम संवत
को उज्जैन के राजा विक्रमादित्य द्वारा ही प्रवर्तित
मानते हैं।
इस संवत के प्रवर्तन की पुष्टि ज्योतिर्विदाभरण
ग्रंथ से होती है,जो कि 3068 कलि अर्थात 34
ईसा पूर्व में लिखा गया था।
इसके अनुसार विक्रमादित्य ने 3044 कलि
अर्थात 57 ईसा पूर्व विक्रम संवत चलाया।
महाराजा विक्रमादित्य का सविस्तार वर्णन
भविष्य पुराण और स्कंद पुराण में मिलता है।
विक्रमादित्य के बारे में प्राचीन अरब साहित्य
में वर्णन मिलता है।
उस काल में उनका शासन अरब तक फैला था।
वस्तुतः विक्रमादित्य का शासन अरब और मिस्र
तक फैला था और संपूर्ण धरती के लोग उनके
नाम से परिचित थे।
इतिहासकारों के अनुसार उज्जैन के सम्राट
विक्रमादित्य का राज्य भारतीय उपमहाद्वीप
के अतिरिक्त ईरान,इराक और अरब में भी था।
विक्रमादित्य की अरब विजय का वर्णन अरबी
कवि जरहाम किनतोई ने अपनी पुस्तक
'सायर-उल-ओकुल' में किया है।
पुराणों और अन्य इतिहास ग्रंथों के अनुसार यह
पता चलता है कि अरब और मिस्र भी विक्रमादित्य
के अधीन थे।
तुर्की के इस्ताम्बुल शहर की प्रसिद्ध लायब्रेरी
💐#मकतब_ए_सुल्तानिया में एक ऐतिहासिक
ग्रंथ है 💐#सायर_उल_ओकुल
उसमें राजा विक्रमादित्य से संबंधित एक
शिलालेख का उल्लेख है जिसमें कहा गया
है कि '…वे लोग अत्यंत भाग्यशाली हैं,
जो उस काल में जन्मे और राजा विक्रम के
राज्य में जीवन व्यतीत किया।
वह बहुत ही दयालु, उदार और कर्तव्यनिष्ठ
शासक था, जो हरेक व्यक्ति के कल्याण के
बारे में सोचता था।
...उसने अपने पवित्र धर्म को हमारे बीच
फैलाया,अपने देश के सूर्य से भी तेज विद्वानों
को इस देश में भेजा ताकि शिक्षा का उजाला
फैल सके।
इन विद्वानों और ज्ञाताओं ने हमें भगवान की
उपस्थिति और सत्य के सही मार्ग के बारे में
बताकर एक परोपकार किया है।
ये तमाम विद्वान राजा विक्रमादित्य के निर्देश
पर अपने धर्म की शिक्षा देने यहां आए…।'
अन्य सम्राट जिनके नाम के आगे विक्रमादित्य
लगा है:-यथा श्रीहर्ष,शूद्रक,हल,चंद्रगुप्त द्वितीय,
शिलादित्य,यशोवर्धन आदि।
वस्तुतः आदित्य शब्द देवताओं से प्रयुक्त है।
आदित्य अर्थात सूर्य जो सृष्टि को आलोकित
करते रहते हैं।
【(परवर्ती काल में विक्रमादित्य की प्रसिद्धि
के बाद राजाओं को 'विक्रमादित्य उपाधि'
दी जाने लगी।
विक्रमादित्य के पहले और बाद में और भी
विक्रमादित्य हुए हैं जिसके चलते भ्रम की
स्थिति उत्पन्न होती है।
उज्जैन के सम्राट विक्रमादित्य के बाद
300 ईस्वी में समुद्रगुप्त के पुत्र चन्द्रगुप्त
द्वितीय अथवा चन्द्रगुप्त विक्रमादित्य हुए।
एक विक्रमादित्य द्वितीय 7वीं सदी में हुए,
जो विजयादित्य (विक्रमादित्य प्रथम) के पुत्र थे।
विक्रमादित्य द्वितीय ने भी अपने समय में चालुक्य
साम्राज्य की शक्ति को अक्षुण्ण बनाए रखा।
विक्रमादित्य द्वितीय के काल में ही लाट देश
(दक्षिणी गुजरात) पर अरबों ने आक्रमण किया।
विक्रमादित्य द्वितीय के शौर्य के कारण अरबों
को अपने प्रयत्न में सफलता नहीं मिली और
यह प्रतापी चालुक्य राजा अरब आक्रमण से
अपने साम्राज्य की रक्षा करने में समर्थ रहा।
पल्लव राजा ने पुलकेसन को परास्त कर
मार डाला।
उसका पुत्र विक्रमादित्य,जो कि अपने पिता
के समान महान शासक था,गद्दी पर बैठा।
उसने दक्षिण के अपने शत्रुओं के विरुद्ध पुन:
संघर्ष प्रारंभ किया।
उसने चालुक्यों के पुराने वैभव
को पुन: प्राप्त किया।
यहां तक कि उसका परपोता विक्रमादित्
द्वितीय भी महान योद्धा था।
753 ईस्वी में विक्रमादित्य व उसके पुत्र का
दंती दुर्गा नाम के एक सरदार ने तख्ता पलट
दिया।
उसने महाराष्ट्र व कर्नाटक में एक और महान
साम्राज्य की स्थापना की,जो राष्ट्र कूट कहलाया।
विक्रमादित्य द्वितीय के बाद 15वीं सदी में
सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य 'हेमू' हुए।
सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य के बाद
'विक्रमादित्य पंचम' सत्याश्रय के बाद
कल्याणी के राजसिंहासन पर आरूढ़ हुए।
उन्होंने लगभग 1008 ई. में चालुक्य राज्य
की गद्दी को संभाला।
भोपाल के राजा भोज के काल
में यही विक्रमादित्य थे।
विक्रमादित्य पंचम ने अपने पूर्वजों की नीतियों
का अनुसरण करते हुए कई युद्ध लड़े।
उसके समय में मालवा के परमारों के साथ
चालुक्यों का पुनः संघर्ष हुआ और वाकपतिराज
मुञ्ज की पराजय व हत्या का प्रतिशोध करने के
लिए परमार राजा भोज ने चालुक्य राज्य पर
आक्रमण कर उसे परास्त किया,लेकिन एक
युद्ध में विक्रमादित्य पंचम ने राजा भोज को
भी हरा दिया था।)】
【【(शाक्यद्वीप (वर्तमान-Egypt या मिस्र)
से आये आक्रांताओं को "शक" कहा गया है।
उन्होंने समुद्री मार्ग से प्रवेश कर आक्रमण किया
और सम्पूर्ण दक्षिणी भारत पर आधिपत्य कर
लिया।
शक भी सनातन धर्मावलंबी थे किंतु क्रमशः
उत्तर भारत की ओर बढ़ते गए।
इसी क्रम में उन्होंने भारतीयों पर अनेक
अत्याचार किये,उनकी वंशवृद्धि भी होती
गयी जिस कारण से उनके साम्राज्य का
विस्तार होता गया।
उनमें शालिवाहन नाम का प्रमुख उल्लेखनीय
शासक था और उसने शालिवाहन (शकसंवत)
नाम का संवत प्रवर्तित किया।(चलाया)
शकों के विस्तारवादी नीति में विक्रमादित्य
बाधक हुए,उन्होंने उन्हें परास्त कर सम्पूर्ण
भारत में एकक्षत्र राज्य स्थापित किया।
शक यहां की संस्कृति एवं संस्कार में
एकाकार हो गए।
शकों में भी वर्णव्यवस्था थी और आज भी
शाक्यद्विपी ब्राह्मण,क्षत्रिय और वैश्य भारत
भूमि पर हैं।
काल गणना के समय भी विक्रम संवत के
साथ साथ शक सम्वत का भी उल्लेख
होता है क्यों कि दोनों विधि से काल
गणना का आधार एक ही है।】】
परवर्ती काल में मुगल आक्रांताओं एवं
अंग्रेज आक्रांताओं के कारण हमारा
इतिहास लुप्त सा हो गया,इतिहास पर
शोध सर्वथा

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...