Wednesday, 25 January 2023

खारबाब कोट ,भिवंडी

 








खारबाब कोट ,भिवंडी 

लेखन ::सुनील आनंदा सणस

प्राचीन काळी कल्याण हे महत्त्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडीमार्गे जहाजांची ये जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर,नागला बंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदराचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी उल्हास खाडीच्या दक्षिणेला घोडबंदर, नागला बंदर गायमुख व ओवळे कोट हे चार किल्ले बांधले गेले तर उल्हास खाडीच्या उत्तरेला नागले, खारबाव, फिरंगाकोट, कांबे कोट हे छोटे छोटे कोट बांधले गेले. वसई खाडी व उल्हास नदी यांच्या बेचक्यात एका छोट्याशा टेकडीवर खारबाव कोट बांधला गेला. वसई खाडी व उल्हास नदीचे रक्षण करण्यासाठी खडीच्या मुखाशी पोर्तुगीजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. वसई- चिंचोटी- अंजुर फाटा भिवंडी मार्गवरून खारबाव गावात जाता येते. खारबव छोट्याशा टेकडीवर वसलेला असून या कोटा विषयी स्थानिकांना किल्ला म्हणून काहीही माहिती नाही. खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र या किल्ल्यात वसलेलं असून या केंद्राची चौकशी केल्यास सहज किल्ल्यात पोहोचता येते अथवा दूरवरून दिसणारी खारबाव गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी देखील याच किल्ल्याच्या आवारात आहे. ही कोण लक्षात ठेवल्यास सहजपणे किल्ल्यात जाता येते. खरबव किल्ल्याचा आकार साधारणपणे चौकोनी असून आज याचा केवळ एक बुरुज आणि तटबंदीची भिंत काही प्रमाणात शिल्लक आहे.येथील स्थानिकांशी बोलताना कळते की आरोग्य केंद्राची पुनर्बांधणी करेपर्यंत काही वर्षांपूर्वी या किल्ल्याचा अजून एक बुरुज व बरीशी पडिक तटबंदी शाबूत होती पण आरोग्य केंद्राचे नवीन काम करताना पाडण्यात आली. कोटाचा आजही शिल्लक असलेला बुरुज दुमजली असून त्यात आत शिरण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे. बुरुजावर तोफा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. खारबाव कोटाचा केवळ इतकाच अवशेष शिल्लक असल्याने त्याची निगा राखली आहे पण बुरुजाच्या भिंतीवर ती झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे बुरुजाच्या भिंतीमध्ये खोलवर रुजत चाललेली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकट माती, चुना यांचा वापर केलेला दिसतो. या कोटाच्या आकारमानावरून येथे जकातीचे व टेहळणीचे ठण्या प्रशासकीय चौकी व सैन्य व रसद यांची देखील व्यवस्था असावी. सदर कोट छोटे खाणी असून पंधरा मिनिटात पाहता येतो. पोटाच्या तटबंदी बाहेर जरी मरीचे मंदिर आहे. आज जरी किल्ला पूर्णपणे अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान आणि वसई खाडी व उल्हास नदीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरुज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसविले. साधारणत सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या तेहळणी वजा कोटाचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या कोटांना रसद पुरवणे हा होता. इसवी सन 1739 मध्ये मराठ्यांच्या वसई मोहिमे त खारबाव, काबे,फिरंगी पाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतूने येथे येणाऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्त्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी...
माहिती साभार - सुरेश निंबाळकर

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...