Tuesday, 30 May 2023

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग ४

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग ४
६. रुद्रदमन (१३० एडी- १५० एडी): मौर्य साम्राज्याचा अस्त होत असतांना शकांनी आपले राज्य स्थापित करायला सुरवात केली. यांच्यातील रुद्रदमन याची कारकिर्द लक्षात राहण्यासारखी.पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि सौराष्ट्रापर्यंत याचे राज्य पसरलेहोते. अनेक क्षत्रप राज्ये आणि एक महाक्षत्रप असे त्याच्या राज्याचे स्वरुप होते. उज्जैनीचा महाक्षत्रप म्हणजे रुद्रदमन, याने गौतमीपुत्र सतकरणी याचा दोनदा पराभव केला पण शेवटी त्याच्याच मुलीशी लग्न करुन हे वैर संपवले. त्याने स्वतःच्या खर्चाने सुदर्शन तळ्यावर धरण बांधले. त्याने अशी शपथ घेतली होती की युद्धाशिवाय इतर वेळी तो कोणाला जीवे मारणार नाही, ही शपथ त्याने शेवटपर्यंत पाळली असे म्हणतात.
७. समुद्रगुप्त (३३५ एडी - ३७५ एडी): अनेक लढाया लढून याने भारतातील दक्षिण, उत्तर येथील अनेक राज्ये पराजित केली आणि आपले साम्राज्य उभे केले. समुद्रावर अधिपत्य गाजवून त्या पलिकडे आपले राज्य वाढावे अशी त्याची इच्छा होती. हिमाचलपासून कृष्णा नदीपर्यंत त्याचे राज्य पसरले होते. हिंदू धर्माचा पालनकर्ता असूनपण त्याने इतर धर्मांना संरक्षण दिले.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...