Tuesday, 30 May 2023

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग ५

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग ५
८. चंद्रगुप्त दुसरा (३७५ एडी - ४१४ एडी): हा समुद्रगुप्ताचा मुलगा. त्याच्या शौर्य आणि पराक्रमामुळे तो विक्रमादित्य म्हणून ओळखला जाऊ लागला. बंगाल आणि पूर्वेकडील अनेक राज्यांचा त्याने पराभव केला. प्रसिद्ध कवी कालिदास हा त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. त्याचे राज्य एक समद्ध राज्य मानले जाते. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.
९. हर्षवर्धन (६०६ एडी - ६४७ एडी): अतिशय बुद्धीमान राजा आणि शूर योद्धा. यानेदेखील आजूबाजुची राज्ये जिंकत आपले साम्राज्य वाढवले. हिंदू आणि बौद्ध असे दोन्ही धर्म तो पाळत असे. नालंदा विद्यापिठाची भरभराट याच्या काळात झाली.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...