भाग १
भारताचा प्राचीन इतिहास सिंधु संस्कृतीच्याही आधीपासून अस्तितवात आहे. सिंधू संस्कृती साधारण ३००० बीसी एवढी जुनी म्हणजेच साधारण ५,००० वर्ष जूनी आहे. त्या आधीही आपल्याकडे वेगवेगळ्या संस्कृती होत्या यात शंका नाही. त्या काळी भारतीय उपमहाद्वीप आणि आजूबाजूच्या प्रदेशात अनेक राजे, महाराजे, राण्यांचे राज्य होते. ६००बीसी च्या आसपास पहिल्या साम्राज्याच्या खूणा आपण इतिहासात पाहू शकतो. हरांक्य आणि त्यापाठोपाठ आलेले नंद साम्राज्य व नंतरचे मौर्य साम्राज्य. आपापसात लढून, आपल्या राज्याला दुसरी राज्ये जोडत ही बलाढ्य साम्राज्यं उभी राहिली, पण भारतात कधीही कोणाही एका राजाचा एकछत्री अंमल नव्हता. गंगा नदीच्या मैदानी प्रदेशातील जनपदं, महाजनपदं, दक्षिणेतील राज्ये कधीही एकसंध नव्हती.
प्राचीन भारतातील या साम्राज्यांनी भारत घडवला एवढं निश्चित. या प्राचीन भारतातील १२ साम्राज्यांविषयी थोडी माहिती.
१. बिंबिसार आणि अजातशत्रू (५५१बीसी ते ५१९ बीसी): बिंबिसार हा पहिला राजा होता ज्याने आजूबाजूची राज्ये जिंकत मगध साम्राज्याचा पाया रचला. ८०,००० गावे आणि जनपदे त्याच्या राज्यात होती. त्याचा मुलगा अजातशत्रू याने आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत हे काम पुढे सुरु ठेवलं. त्याने वैशाली राज्याच्या लिच्छावी वंशाचा केलेला पराभव सर्वज्ञात आहे.

No comments:
Post a Comment