15 व्या शतकात लोधी वंश चे राज्य होते ...सिंधू नदी च्या पलीकडे अफगाणिस्तान च्या कबिला मध्ये अनेक अफगाणी लोक राहत जे गरीब होते शिकार करून जगत ..दरोडा आणि छोट्या छोट्या राजांच्या लढाई मध्ये पैसे घेऊन लढाई करत ..दिसायला उंच शरीराने बलाढ्य ..लढाई मध्ये तरबेज असणे हे यांचं वैशिष्ट्य...भारतात अनेक राजे यांना पैसे देऊन लढाई मध्ये बोलवत ..असेच एक अफगाणी सरदार #सलामत_अली_खान अफगाणिस्तान मधील #भडाच भागातील ..याला पहिल्यांदा बहलोल लोधी ने मेवाड मधील भाग जिंकण्याससाठी बोलावले होते ..
दिल्लीमधील सत्ता पालट झाली आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरने राजगादी घेतली ..आतापर्यंत लोधी कडे सैन्यात काम करणारा सलामत अली खान आणि त्याच्या बाकी परिवारातील लोक बाबरच्या सैन्यात गेला ..आणि मोघलांच्या दरबारात काम केले ..सलामत अली खान चा मुलगा अर्फ खान ने मोघलांच्या दरबारात इतके पक्के स्थान निर्माण केले की वेगवेगळ्या हुद्यावर नेमले ..पण 18 व्या शतकात औरंगजेब मेल्यानंतर मोघल साम्राज्य तुटायला लागले ...त्यामुळे यांच्या कडे काम राहिले नाही ..त्यांनतर यांनी अफगाणिस्तान मधून अजून नातेवाईक आणि लोक बोलावून स्वतःची सैन्य निर्माण करून पैसे घेऊन भारतातील अनेक राजांकडे लढाई करणे हे आपले जुने काम चालू केले ..
18 व्या शतकाच्या शेवटी दिल्ली मध्ये मोघल संपत होते त्यावेळी #मोघल_बादशाह_शाह_आलम दुसरा हा गादीवर होता ..आणि सलामत अली खान च्या पिढीतील #फैज_तलब_खान सेवेसाठी होता ..याच वेळी अहमद शाह अब्दाली आणि रोहिला हे आणि अनेक लोक दिल्लीवर आक्रमण करत ..म्हणून शाह आलम ने त्यावेळचे सगळ्यात शक्तिशाली असलेले #मराठा_सरदार #महादजीराव_शिंदे हे उत्तरेत काम करत यांची मदत घेतली ..1770 पासून 1780 पर्यंत पतोडी, दिल्ली गुडगाव हे सगळं शिंदे यांच्या ताब्यात होते ..मोघल राजे मांडलिक म्हणून काम बघत ..तेव्हा महादजी शिंदे यांच्या मुलाकडे #दौलतराव_शिंदे यांच्या कडे कामाला राहिला ..हाच तो काळ ज्या काळात पूर्ण दिल्ली मराठा साम्राज्याच्या अधीन होती ..
पण याच वेळी दिल्लीवर नजर होती ती इंग्रजांची..1775 ते 1782 मध्ये इंग्रज आणि मराठा यांच्या युद्ध झाले होते आणि ही युद्ध मराठ्यांनी जिंकली होती पण फैज तलब खान आणि काही अफगाणी सैनिक अचानक इंग्रजांच्या बाजूने लढले पैसे घेऊन ..अश्या प्रकारे मराठ्यांना धोका दिला मराठ्यांचे अनेक सैनिकी महत्त्व पूर्ण माहिती इंग्रजांना दिली ..त्याकाळी होळकर आणि भरतपूर चे राजा यांना सुद्धा अश्या प्रकारे हरवल ..
इंग्रजांनी गद्दारीचे बक्षीस म्हणून फैज अली खान ला पतोडी दिले 1804 मोहम्मद फैज अली खान सिद्दिकी हा पहिला नवाब घोषित केला गेला ..त्यांनतर इंग्रजांना अनेक राज्य मिळवण्यासाठी मदत केली..
पण 1857 च्या उठवानंतर उत्तरेत इंग्रजांच्या विरोधात क्रांतिकारक यांचे आवाज वाढू लागले ..अश्याच काही क्रांतिकारक लोकांनी गुडगाव मध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याला घेरले आणि ताब्यात घेतले होते पण त्याच वेळी फैज अली खान चा दुसरा नवाब #अकबरअलीखान ने या क्रांतिकारक लोकांवर हमला केला आणि इंग्रज अधिकारी सुटला यानंतर पतोडी वर क्रांतिकारक लोकांनी हमला केला पण त्यांच्या कडे इंग्रजांनी दिलेले आधुनिक हत्यार असल्याने शेकडो क्रांतिकारक मारले गेले ..यासाठी पतोडी नवाब ला बक्षीस दिले गेले .
पतोडी च्या थोड्या अंतरावर झुझ्झर हे छोटे राज्य (रियासत)होते.. जे पतोडी च्या नवाब चे सासर होते ..तिथला राजा #अब्दुल_हमीन खान बायकोचा भाऊ हा क्रांतिकारक लोकांना मदत करतो म्हणून पकडून दिला गेला इंग्रजांनी त्याला फाशी दिली ..त्यांनतर इंग्रजांना भारतावर राज्य करणे सोपं गेलं फोडा आणि राज्य करा त्यामुळे कोणत्याही मदतीची गरज राहिली नाही पूर्ण देश इंग्रजांच्या ताब्यात होता ..
यानंतर बऱ्याच पिढीने पतोडी वर राज्य केले ..1917 मध्ये #इफतिकार_अली_खान ..अवघ्या 7 व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे राजगादी मिळाली पण आईने कारभार बघितला आणि यांना लंडन ला शिकण्यासाठी पाठवले.. तिथं इंग्लंड च्या टीम मध्ये क्रिकेट खेळल ..1932 मध्ये क्रिकेटर ऑफ द इअर चा खिताब दिला गेला .
1946 मध्ये भारतीय टीम मधून खेळले यांचे लग्न भोपाळ चे नवाब #हमीदउल्ला_खान ची मुलगी #साजीदा_सुलतान यांच्या बरोबर झाले त्यावेळी भोपाळ श्रीमंत राजघराणे होते ..आपल्या मुलीला कोणताही त्रास नको म्हणून रॉबर्ट टॉर्र वसेल हा प्रसिद्ध इंग्रज आर्किटेक्ट याला मोठा महाल बांधायला सांगितला (ज्याने देशातील अनेक इंग्रजांच्या इमारती बांधल्या होत्या )..पतोडी मध्ये 150 खोल्यांचा महाल बांधला गेला ..इथं त्यांना 3 मुली आणि एक मुलगा झाला ..
पण 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी बरेच नवाब पाकिस्तान मध्ये जाण्यासाठी आग्रही होते यात हमीदउल्ला खान भोपाळ सहित जोधपूर आणि अर्धे राजस्थान पाकिस्तान मध्ये जावे म्हणून प्रयत्न करत होते ..पतोडी नवाब ला काही ऑप्शन नव्हता छोटे राज्य आणि आजूबाजूच्या सगळ्यांनी भारतात आपले राज्य विलीन करायचे ठरवले ..हमिदउल्ला खान आपल्या तीन मुलींना घेऊन पाकिस्तान मध्ये निघून गेल्या मुळे इथली सगळी प्रॉपर्टी पतोडी च्या बायकोला म्हणजे साजीदा सुलतान ला मिळाली ..पण काही दिवसांनी पोलो खेळताना इफतेकर अली खान चा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला ..साजिद सुलतान पार्लमेंट मध्ये सभासद झाली ..
त्यानंतर पतोडी चा नवाब झाला #मन्सूर_अली_खान ..याने सुद्धा भारतीय टीम मध्ये क्रिकेट खेळले .1968 मध्ये #शर्मिला_टागोर यांच्याशी लग्न केले यांना 3 मुलं झाली ..2 मुली आणि एक मुलगा सैफ अली खान ..
पुढच्या इतिहास आपल्याला माहिती आहेच ..सैफ अली खान हा 10 वा नवाब आहे पतोडी राज्याच्या ...
पण यांचा इतिहास नेहमीच भारतीय लोकांच्या विरोधात होता आणि स्वार्थी होता ..आजही यांच्या मुलांची नाव तैमुर आणि जहांगीर अशी आहेत ..यात आपल्याला नवल वाटायला नको ...आजीच्या भोपाळ च्या प्रॉपर्टी ची केस एनिमी ऍक्ट नुसार आजही चालू आहे ..एकतर ती संपत्ती सरकार जमा होऊ शकते किंवा ही केस वर्षोनुवर्षे चालतच राहील ..


No comments:
Post a Comment